मराठा आरक्षण व शेतकरी समस्या करिता राष्ट्रीय स्वराज्य सेना मैदानात

47

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.18सप्टेंबर ):-राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राष्ट्रीय पक्ष) चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. श्रीहरी बागल साहेब , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सदीप पवार साहेब व राष्ट्रीय स्वराज्वय सेना पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यानी दिनांक शनिवार 19- 9-2020 सकाळ आठ वाजल्या पासुन पांच दिवसाचा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे जिल्ह्याचा दैरा चालु केला आहे.

महाराष्ट्रत अनेक ठीकाणी माठया प्रमाणात अवकाळी पावसाने शेती व फळभागाचे मोठे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे होऊन प शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणयासाठी व मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे अशी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षांची भुमिका आहे. मराठा समाजाला ठीकणारे आरक्षण कसे मीलेल या साठी शांततेने कसे मार्ग निघतील या बद्दल जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे .

कोणतीही अनुचित प्रकार घडु नये.समाजात कायदा व सुव्यवस्था टीकुन राहण्यासाठी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सरकार ने कांद्या निर्याती वरील बंदी उठवण्यासाठी लेखी नीवेदन नाशीक जिल्हा कलेक्टर याना देणयात येणार आहे. त्या वेळीस येवळा व परिसरातील शेतकरी वर्गशी चर्चा करण्यात येणार आहे.स्वच्छता कामगार, डॅकटर वर्गाचे प्रश्न समजुन त्याना न्याय देण्यासाठी महविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन जिल्हा नीहाय दौरा चालु केले आहेत.