राहुल गांधीं वरील धक्काबुकी हि लोकशाहीची गळचेपी

31

🔺काँग्रेस कडून मोदींच्या पुतळ्याचे दहन, मोदी विरोधात निदर्शने

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.1ऑक्टोबर):- सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्या. या दरम्यान, युपी पोलिसांकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्कि करण्यात आली आहे. हा प्रकार मोदी सरकारने मुद्दामून घडवून आणला असून हि मोदी सरकारने लोकशाहीची गळचेपी केली असल्याच्या आरोप चंद्रपूर शहर काँग्रेसने केला आहे. आज गांधी चौक येथे मोदी सरकारच्या विरोधात घोषणा व मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री विजय वड्डेटीवर, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस ऍड. मलक शाकीर, किसान काँग्रेस अध्यक्ष रोशन पचारे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रझा, घनशाम मुलचंदानी, महिला शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल, किसान काँग्रेस अध्यक्ष रोशन पचारे, नगरसेवक नंदू नगरकर, नगरसेविका सुनीता लोढीया, किसान काँग्रेस शहर अध्यक्ष भालचंद्र दानव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव सचिन कत्याल, युवा काँग्रेस प्रदेश सचिव रुचिता दवे, एन. एस. यू . आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, एन. एस. यू. आय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरीश कोट्टावार, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इमरान हाजी, युवा काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश अडूर, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, माजी नगरसेविका एकता गुरूले, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष नौशाद शेख, पप्पू सिद्दीकी, संदीप सिडाम, तौफिक शेख, सुरज कन्नूर, केतन दुरसेल्वार, राजू वासेकर यांची उपस्थिती होती.

‘हाथरसनंतर आता बलरामपुरमध्येही एका मुलीवर सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा मोठा अपराध आहे. भाजप सरकारने बलरामपुरमध्ये हाथरससारखा निष्काळजीपणा करु नये, तर गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी’ तसेच राहुल गांधी यांना धक्काबुक्कि करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मागणी चंद्रपूर शहर काँग्रेसने केली आहे.