कर्जदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

26

🔹लोन मोरेटोरियमचे व्याज केंद्र सरकार भरणार

🔸कर्जदार सुखावले, पडली आनंदात भर

✒️अतुल उनवणे(पुरोगामी संदेश न्यूज ब्यूरो चीफ,नवी दिल्ली)मो:-9881292081

नवी दिल्ली(दि.4ऑक्टोबर):-भारतीय रिजर्व बँकेने कर्जदारांना अगोदर तीन महिने व नंतर तीन महिने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलासा दिला होता.31ऑगस्ट ला ही मुदत संपली आहे.कोरोना व्हायरस च्या संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले होते.त्यानंतरही रोजगार गेलेल्यांना रोजगार अथवा नौकरी मिळन्याची शक्यता कमीच होती.यामूळे सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली होती.

कोरोना व्हायरसच्या काळात भारत देशात लॉकडाऊन लागल्यानंतर आर बी आई ने लोन मोरेटीरिअम जाहीर केलं होते.यामूळे रोजगार गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.मात्र, बँकांनी या काळातील चक्रवाढ व्याज आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे थकलेल्या ईएमआयपेक्षा कितीतरी अधिक पटींनी या व्याजाचा भुर्दंड ग्राहकांना बसणार होता. यावर आता मोठादिलासा मिळाला आहे.आधी तीन महिने आणि नंतर तीन असे सहा महिने ईएमआय दिलासा दिला होता. 31ऑगस्टला ही मुदत संपली होती.

याकाळात अनेकांचा कोरोना संकटामुळे रोजगार गेला होता. त्यानंतरही त्यांना नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयात एका
वकिलाने याचिका दाखल केली होती. यावर केंद्राने तोबँकांचा विषय असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने केंद्र सरकार, आरबीआय जबाबदारीपासून पळू शकत नाही असे सुनावले होते.तसेच पुढीलवेळी नियोजनबद्ध रित्या कोर्टात हजार होण्याचे आदेशही दिले होते.

यावर केंद सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे.
यामध्ये बँक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या मोरेटोरियमवर
अतिरिक्त व्याज माफ केले जाणार असल्याचे म्हटले
आहे. म्हणजेच एमएसएमई, एजुकेशन, होम, कंज्यूमर,
ऑटो लोनवर लागू केलेले चक्रवाढ व्याज वसूल केले
जाणार नाही. तसेच क्रेडिट कार्डवरील व्याजही वसूल
केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबतचे वृत्त
आज तकने दिले आहे.चक्रवाढ व्याजाचे गणित कसे होते?
आरबीआयच्या सूचना सर्वात आधी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक अंमलात आणते. पण या बँकेनेच ही माहिती देऊन ईएमआय दिलासा घेऊ इच्छिणाऱ्यांची झोप उडविली होती. एसबीआयने त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली आहे. यावर त्यांनी हा ईएमआय दिलासा म्हणजेच न भरण्याची सूट दिल्याचे म्हटले होते. तसेच ही योजना कशी लागू होईल याबाबतही सांगितले होते. यामध्ये त्यांनी वाहन आणि गृह कर्ज अशी दोन उदाहरणे दिली आहेत.

• जर तुम्ही ६ लाखांचे वाहन कर्ज ५४ महिन्यांच्या
मुदतीचे घेतले असेल आणि आरबीआयनुसार तीन
महिन्यांचा दिलासा घेतला तर तुमच्या कर्जाला
मुदतवाढ मिळणार आहे. तसेच या काळातील एकूण
रकमेवर तब्बल १९००० रुपये व्याजबआकरले जाण्याची शक्यता आहे. ही रक्कम तुमच्या कारच्या हप्त्याच्या दीड पट असणार होती.

• जर तुम्ही ३० लाखांचे १५ वर्षांच्या मुदतीचे गृहकर्ज
घेतले असेल तर तुम्हाला तीन महिन्यांचे एकून कर्जाच्या रकमेचे व्याजच २.३४ लाख रुपये भरावे लागणार आहे.हे व्याज म्हणजे तूमच्या घराचे 8हप्ते असणार होती.

एकूणच काय तर तुम्ही कर्जाचे तीन हप्ते टाळण्यासाठी किंवा विलंबाने भरण्यासाठी हव्यास धरला तर वाहनाचा दीड महिन्याचाच EMI दिलासा मिळणार होता.तर घराचे कर्ज असलेल्यांना तर तीन महिन्याचे हप्ते आणी व्याजाचे आठ महिन्याचे हप्ते असे अकरा हप्ते जास्त भरावे लागणार होते.यावरील सर्व व्याज आता सरकार भरणार आहे.