हाथरस येथील घटनेचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध

26

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10ऑक्टोबर):-हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या वाल्मिकी समाजातील युवती वरील अमानुष अत्याचार व हत्याकांडाचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
कोल्हापूरातील बिंदू चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.

हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व मृतदेहाचे परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या पोलीस अधिकारी,जिल्हा दंडाधिकारीनां बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करावे.अाशा मागण्या करण्यात आल्या.
हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांना सहआरोपी करण्यात येऊन अटक करावी.

पक्षपाती भूमिका घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशा प्रकारच्या घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून गेला.
यावेळी अॅड. दत्ताजीराव कवाळे म्हणाले की, हाथरस प्रकरणांमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली आहे. सरकारने अत्यंत. पक्षपाती भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून आरोपींना पाठीशी घालण्याचे दुष्कृत्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे थांबले पाहिजे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.

महिलांच्या तसेच दलित व अल्पसंख्यांकांच्या अत्याचारावर कठोर पायबंद घालण्यासाठी शासकीय पातळीवर काम झाले पाहिजे. यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे, लहुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशालभाई देवकुळे,अॅड. सरदार किरवेकर , बहुजन सेनेचे अध्यक्ष आदिनाथ भाई साठे,बंडा अवघडे,अनिकेत वाघमारे, रमेश आपटे, युनिस पटवेगार, रमेश देवकुळे, गणेश पांढरबळे, अण्णाप्पा खमलेहट्टी, बाळासाहेब साळवी, अर्जुन बुचडे, दिनेश पोतदार, भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे,कुमार दाभाडे आदी विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.