केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक समाज तर्फे सुमारे ३०० शेतकरी दिल्लीकडे रवाना

24

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.4जानेवारी):- धुळे व नंदूरबार जिल्हा तील सुमारे ३०० शेतकरी दिल्ली कडे रवाना झाले आहेत. सकाळी नवापूर व साक्री परिसरातून जमलेले शेतकरी दुपारी ०४:३० वाजता धुळे जिल्ह्यात आगमन झाले धुळे शहराच्या सरहद्दीवर दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकरी बांधवांचे जोरदार स्वागत करण्यात आले रॅलीचे नेतृत्व कॉ.किशोरजी ढमाले व कॉ.काकुस्ते व त्यांचे सर्व सहकारी करीत आहेत.धुळे शहराच्या सरहद्दीवर आज या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी एम.जी.धिवरे, मा.आमदार प्रा.शरद पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर,दैनिक आपला महाराष्ट्राचे संपादक हिम्मतराव मदाने,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रणजितराजे भोसले, नगरसेवक मुजफ्फर हुसेन,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील,पंचायत समिती सदस्य राजेंद्रजी देवरे,महेंद्र शिरसाठ,राजेंद्रजी चितोडकर,महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष पराग फास्ते, जिल्हा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शामकांत भामरे,मुजफ्फर हुसैन,राजा भैय्या,अब्दुल अहमद असीदी,हाजी मुनाफ शेख,जावेद मल्टी,असलम सिराज,शकील अहमद,शोएब पहलवान,अनिस मुल्ला,शब्बीर पहलवान,जाविद शाह,शकील ईसा सलीम लंबु,एजाज शेख,रईस काझी, असद खाटीक,माजीद भाई हासीम, कुरैशी शकीला मेटम इ. उपस्थित होते.