उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

31
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5जानेवारी):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने, नियम व अटी dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2021 असा आहे.
पुरस्कारांची नावे – सर्व पुरस्कारासांठी 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर), यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर), लाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर), समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर), स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर), पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर).