बीड जिल्हाधिकार्‍यांनीही 28 फेब्रुवारी पर्यंत मनाई आदेश ठेवला कायम

26

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2फेब्रुवारी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत.त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.

असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे . त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.