भीम आर्मी यवतमाळ जिल्हा यांच्यावतीने जलसंपदा मंत्री मा. जयंतजी पाटील यांना निवेदन

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

यवतमाळ(दि.6फेब्रुवारी):- जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील चाळीसगांव माळपठार जलयोजना गेल्या एका वर्षापासुन बंद आहे.त्यामुळे त्या विभागातील ग्रामीण भागांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.!ही योजना पूर्ववत करण्यासंबधी आज राष्ट्रवादी परिवार सवांद यात्रेच्या निमित्ताने आलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतजी पाटील साहेब यांची बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद च्या सभागृहामध्ये भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विदर्भ उपाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, माजी सैनिक नितीन धुळे, यवतमाळ जिल्हाप्रमुख अशोक भालेराव, मुख्यमहासचिव धनराज कांबळे,महासचिव प्रसाद खंदारे,सरचिटणीस श्याम देवकुळे,उपाध्यक्ष पिंटूभाऊ काळबांडे,सनी पाईकराव,पुसद तालुका संघटक गोपाल जगताप, सरचिटणीस प्रभाकर भालेराव,प्रशिक खडसे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.