अन्यथा मुंबई ला जाणाऱ्या विज वाहिन्या बंद पाडु- स्वाभिमानीचे युवा आघाडी

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.15फेब्रुवारी);- जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातुन जाणाऱ्या मेन टॉवर लाईनवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याबाबत राज्यसरकारने विज ग्राहकाला दिलेला शब्द पाळला नाही तर विदर्भातुन मुंबई ला जाणारी लाईन बंद करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीने सरकारला दिला आहे.

ग्राहकाचे कनेक्शन कापुन ग्रामिण भागातिल जणतेला अंधारात ठेवत असाल तर संपुर्ण मुंबई अंधारात ठेवू प्रशांत डिक्कर यांनी इशारा दिला.