चंद्रपूर जिल्ह्यात (दि.25फेब्रुवारी) रोजी 24 तासात चार कोरोनामुक्त 42 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.25फेब्रुवारी):-जिल्ह्यात मागील 24 तासात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 42 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 513 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 897 झाली आहे. सध्या 218 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 12 हजार 162 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 86 हजार 786 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वरोरा तालुक्यातील 16 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 398 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 42 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 16, बल्लारपूर दोन, भद्रावती सहा, मुल एक, राजुरा चार व वरोरा येथील 13 रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.