✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)
अहेरी(दि.3मार्च):-नगरपंचायत क्षेत्रातिल घरकुल लाभर्थ्यांना लवकरच प्रारंभ आदेश देण्यात येणार असुन घरकुल बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे परंतु मागील दिड ते दोन वर्षापासून प्राणहीता नदी घाटचे शासना तर्फे लिलाव करण्यात आलेले नसल्याने अहेरीकराना बाहेरून रेति आणावी लागत आहे.
बाहेरून गाववरून महाग रेति विकत घेणे गरीब लाभर्थ्यांना परवडणार नाही करिता घरकुल लाभर्थ्यांना शासकीय दरात नजीकच्या प्राणहीता नदी घाटवरून रेति उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली