चंद्रपूर जिल्ह्यात (दि.30मार्च) रोजी 24 तासात 125 कोरोनामुक्त 39 कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधिताचा मृत्यू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.30मार्च):-जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 39 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 27 हजार 477 वर पोहोचली आहे.

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 62 झाली आहे. सध्या 1990 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 71 हजार 655 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 40 हजार 731 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये गाडीसुरला ता. मुल येथील 52 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 425 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 385, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 39 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 26, चंद्रपूर तालुका दोन, नागभीड एक, सिंदेवाही एक, राजूरा दोन, चिमूर एक, वरोरा तीन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.