वाघाच्या हल्ल्यात ठार मृतकाच्या परिवाराचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.3एप्रिल):- सकाळी सिंदेवाही तालुक्यातील शिवनी जंगल परिसरात श्रीधर आत्राम वय 55 यांच्यावर वाघाने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या बाबीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ग्रामपंचायत सिरकाळा येथे जाऊन मृतकाच्या परिवाराची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. पालकमंत्री यांनी मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत केली तसेच वनविभागामार्फत देखील तातडीने शासकीय मदत देण्यात आली आहे.