चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8एप्रिल) रोजी 24 तासात 218 कोरोनामुक्त 668 कोरोना पॉझिटिव्ह – नऊ कोरोना बधितांचा मृत्यू

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.8एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 918 झाली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 56 हजार 203 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील 36 वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील 40 वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील 80 वर्षीय महिला, नागभीड येथील 67 वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील 52 वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 50 वर्षे महिला, वरोरा शहरातील 60 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 456 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 413, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 668 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 175, चंद्रपूर तालुका 50, बल्लारपूर 36, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 21, नागभिड 31, सिंदेवाही नऊ, मूल 37, सावली 23, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी दोन, राजूरा 25, चिमूर 39, वरोरा 133, कोरपना 37, जीवती दोन व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 2 मृत्यूसह आज(8 एप्रिल) 219 नवीन कोरोना बाधित तर 37 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.8एप्रिल):-आज जिल्हयात 219 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11602 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10442 वर पोहचली. तसेच सद्या 1036 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 124 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये वनश्री कॉलोनी गडचिरोली येथील 53 वर्षीय पुरुष व भामरागड येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.00 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.93 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

नवीन 219 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 77, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 6, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 12 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 17 व इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 37 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 28, अहेरी 1, भामरागड 07, कुरखेडा 1 येथील जणाचा समावेश आहे.

काल सायंकाळपर्यंत लसीकरणाचे तपशील – जिल्हयातील शासकीय 67 व खाजगी 2 अशा मिळून 69 बुथवर काल पहिला लसीकरणाचा डोज 3304 व दुसरा डोज 292 नागरिकांना दिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पहिला डोस 40502 तर दुसरा डोज 10455 नागरिकांना देण्यात आला आहे.

🔺तहसिलदार चामोर्शी यांच्याकडून कोविड-19 च्या अनुषंगाने सूचना जाहीर

गडचिरोली,(जिमाका)दि.08: जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच कोविड-19 साथरोग अंतर्गत टाळेबंदीबाबत नियमावली लागु करण्यात आली आहे. तसेच शासन निर्देशाप्रमाणे कोविड -19 साथरोग अंतर्गत उक्त मिशन बिगीन अगेन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधीत बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदी संदर्भात नियमावली आणि उपाययोजना दि. 30 एप्रिल 2021 चे 24.00 पर्यंत लागु करुन जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कंटेनमेंट झोन वगळुन) ज्या बाबींना शासन व जिल्हा प्रशासनाने आदेशानुसार सुरु ठेवण्याची परवानगी अनुज्ञेय असेल ते सुरु ठेवण्याची मुभा असेल तर ज्या बाबींना प्रतिबंध आहे त्यांना पुढील आदेशापर्यत सुरु करता येणार नाही. तसेच शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश सुचना अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे.

तसेच शासकीय कार्यालयात कोणत्याही शासकीय कंपन्यामध्ये अभ्यागतांना भेटण्याकरीता परवानगी देण्यात येणार नाही. त्याकरीता कार्यालयामध्ये ईमेल tahsilcha.covid19@gmail.comतात्काळ सुरु करण्यात आली आहे. व अपवादात्मक परिस्थितीत जर शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांना भेटायचे असेल तर अभ्यागतांसाठी पास देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु ज्याकडे 48 तासांच्या आतील नकारात्मक RTPCR प्रमाणपत्र असेल त्यानांच कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात येईल. असे तहसिलदार चामोर्शी जितेन्द्र शिकतोडे यांनी कळविले आहे.