शौचालयाच्या टाकीतील आयटीसेलवाल्या तमाम लावारीस औलादींना समर्पीत

25

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

चार-पाच दिवसापुर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. सदर पोस्टवर अतिशय अश्लिल शिव्यांचा पाऊस पडतो आहे. “कोरोना गांडूवृत्तीच्या लोकांनाच होतो !” असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उपरोध म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर “योगी आदित्यनाथ बी गांडू निघाले राव !” अशी पोस्ट टाकली होती. त्यात योगींचा अवमान करण्याचा नव्हे तर संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा उपरोध करणे इतकाच हेतू होता. सदर पोस्टवर गेल्या चार दिवसांपासून शिव्यांची लाखोली सुरू आहे. भाजपाच्या शौचालयातील आयटीसेलवाल्या आळ्यांनी आई-बहिणीवरून अतिशय अश्लिल, अतिशय निच व हलकट वृत्तीच्या शिव्यांचा पाऊस पाडला आहे. खरेतर यात मला काही आश्चर्य किंवा नवल वाटले नाही. भाजपाची डोर अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या हातात गेल्यापासून त्यांनी अशी पिलावळ पोसली आहे.

तेव्हापासून देशात जे जे त्यांच्याविरोधात लिहीत आहेत, बोलत आहेत त्यांच्याविरूध्द अशीच भाषा वापरली जाते आहे. एखाद्या टॉयलेटच्या टाकीवरील (शौचालय) झाकण काढले की आतून जशी टोकाची दुर्गंधी येते व त्यात वळवळ करणारे किडे जसे दिसतात तसेच भाजपाच्या आयटीसेलवाल्या पिलावळी आहेत. ही दुर्गंधी तसलीच आहे. गेले आठ-दहा वर्षे देशात विरोधातल्या लोकांच्यावर शिव्यांचा भडीमार करण्याचे काम ही दुर्गंधी करते आहे. यात काय नविन किंवा विशेष नाही. मलाही अशा शिव्यांची व धमक्यांची सवय झाली आहे. सोनिया गांधी, माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग, शरद पवार, राहूल गांधी असे विरोधातले अनेक नेते तसेच विरोधात लिहीणा-या काही पत्रकारांनाही या शिव्यांचा सामना करावा लागतो आहे. विरोधात लिहीणा-या व बोलणा-या लोकांना शिव्या घालून त्यांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशाने काही आवाज बंद होतील पण सगळेच बंद होतील असे नाही.

विशेष म्हणजे शिव्या देणारे हे सगळे भडवे धर्माची व संस्कृतीची भाषा बोलतात. त्यांच्या फेसबुकला छत्रपती शिवाजी महाराज, श्रीरामाचे फोटो लावलेले असतात. भगव्या झेंड्याचे फोटो लावलेले असतात. खरेतर या सगळ्या विकृती छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम यांना व त्यांच्या परंपरेला बदनाम करतायत. भगवा झेंडा व त्याची महानता बदनाम करतायत. ज्या छत्रपती शिवरायांनी परस्त्रीचा आदर करायला शिकवले, तिला माते समान मानायला शिकवले त्या छत्रपतींचे नाव घेवून हे स्त्रीयांचा अपमान करणार, दुस-यांच्या आया-बहिणींबद्दल अश्लिल बोलणार हे कसं शक्य आहे ? असली बांडगुळ छत्रपती शिवरायांच्या विचारकक्षेतील, परंपरेतील असूच शकत नाहीत. अफझलखानाच्या पोटालाच असल्या औलादी शोभतात. अफझलखानाच्या व औरंगजेबाच्या रक्ताचा काही अंश भारतात उरला असेल तर तो या औलादींच्याच रूपाने उरलेला असावा. त्याच रक्ताची ही औलाद असू शकते. अस्सल भारतीय संस्कृतीत जन्माला आलेला कुठल्याही जातीचा व धर्माचा माणूस या थराला जावू शकत नाही.

मग तो भारतीय जनता पक्षातला असला तरी तो ही भाषा व असली विकृती जोपासू शकत नाही. अस्सल भारतीय संस्कृती, सभ्यता, सहिष्णूता व परंपरा असल्या विकृतीला थारा देवू शकत नाही. तसे असते तर तिथे अटलबिहारी वाजपेयीसारखे नेते निर्माण झाले नसते. संघ विचार संकुचित असला तरी तिथेही भारतीय संभ्यता व संस्कृती जोपासणारी पिढी घडली. अलिकडे मोदी-शहा व फडणवीसांच्या युगातली ही घाण त्या परंपरेला शोभणारी नाही. भारतीय संस्कृती, सभ्यता सोडाच पण या औलादी भाजपाच्या व संघाच्याही परंपरेलाही शोभत नाहीत. असली विषाक्त मस्तकाची विकृत पैदास यापुर्वी कुठल्याच पक्षात, संघटणेत जन्माला आलेली नव्हती. अनेक पक्ष संघटनात मतभेद होते, मनभेद होते पण या थराला आजवर कुणी गेलेले नव्हते. ही अफझल खानाच्या रक्ताची पैदास एक दिवस भारताचा तालिबान केल्याशिवाय सोडणार नाही. असल्या बांडगुळांच्या हातात भगवा तर अजिबात शोभत नाही. भगवा शोभतो बुध्दांच्या अंगावर, भगवा शोभतो छत्रपती शिवरायांच्या झेंड्यावर, भगवा शोभतो समतेचा पुकारा करणा-या द्नानोबा-तुकोबांच्या पताकेवर आणि या सर्वांच्या विचारांचे पाईक होवून चालणा-या तमाम भारतीयांच्या हातात. आयटीसेलवाल्या शौचालयातील आळ्यांना आणि त्यांना जन्माला घालणा-या विकृतांना भगवा शोभत नाही.

गेली अनेक वर्षे मी राज्यकर्त्यांच्या नालायकीविरूध्द लिहीतो आहे. जे जे चुकले त्यांच्या विरूध्द लेखणी चालवली आहे. ज्या काळात संघवाले कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराविरूध्द, उन्मत सत्तेविरूध्द लिहायला धजावत नव्हते त्या काळात त्यांच्या विरोधात मी बेडरपणे लिहीले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्याविरूध्द लिहीले पण तिथे कुणी असली पैदास जोपासली नव्हती. असल्या विकृत हलकटांची फौज कुणी उभी केलेली नव्हती. आयटीसेलवाल्या लावारीस औलादींनी कितीही शिव्या घातल्या तरी मी थांबणारा नाही. आम्ही लिहीतो, बोलतो ते बेधडक. धडधडीतपणे स्वत:चे नाव टाकून, मोबाईल नंबर टाकून लिहीतो कारण तेवढी जिगर व धमक आमच्या छातीत आहे. आमची छाती म्हणजे छप्पन इंचाची बोगस टरफलं नव्हेत. स्वत:च्या प्रोफाईल लॉक करून, बोगस नावाने अकाऊंट काढून दुस-यांना शिव्या देणारी बांडगुळं काय लढणार आहेत ? तथाकथित छप्पन इंच छातीवाल्याची ही नपुंसक फौज सत्याचा आवाज नाही दाबू शकत. आम्हालाही शिव्या देता येतील. हत्ती, घोडे, गाढव, डूक्कर आणि यच्चायावत जाती-जमाती लावता येतील. आम्हालाही स्त्री-पुरूष शरिराच्या सगळ्या अवयवांची नावे पाठ आहेत पण ती संस्कृती आमची नाही. इतरांच्या आया-बहिणींचा अवमान करणे, त्यांच्यावर अश्लिल शेरेबाजी करणे आमच्या रक्तात नाही.

कारण आम्ही बुध्दाच्या, शिवरायांच्या, द्नानोबा, तुकोबारायांच्या परंपरेचे पाईक आहोत. भारतीय संस्कृतीतली सभ्यता व सहिष्णूता जपणारे आहोत. आमच्यावरील संस्कार आम्हाला या थराला जावू देत नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही या बांडगुळांच्या शिव्याला घाबरून शांत बसू. जितके शिव्या द्याल, जितका विरोध कराल, जितके दाबायचा प्रयत्न कराल तेवढाच आवाज ऊसळून उठेल. तेवढाच हा सत्याचा आवाज बुलंद होईल. मला काही मित्रांनी फेसबुकवरील त्या शिव्यांची लाखोली वाहिलेल्या कमेंट डिलीट करण्यास सांगितले पण मी त्या जाणिवपुर्वक डिलीट केल्या नाहीत. कारण या आयटीसेलवाल्या विकृत औलादी काय लायकीच्या आहेत ? हे लोकांना कळायला हवे. हे निच भडवे कुठल्या थराला जावू शकतात ? हे लोकांना कळायला हवे. त्यांच्या शिव्यांनी माझे काही वाकडे होत नाही, होणारही नाही. या भडव्यांनी शिव्या देवून ना माझ्या आईचा अवमान होईल ना बहिणीचा होईल. खरेतर यांच्या शिव्यांनी अवमान होईल त्यांच्याच आईचा व बहिणीचा. ज्या मातेच्या पोटाला या नपुंसक औलादी आल्या आहेत त्या मातेच्या कुशीला हे कलंक आहेत. या शिव्या वाचताना कुठलाही सभ्य माणूस, शहाणा माणूस प्रश्न करेल तो शिव्या देणा-यांच्या माऊलीबद्दल. तिच्या व त्यांना जन्माला घालणा-या बापाच्या संस्काराबद्दल. या बांडगुळांच्या भुंकण्याने वज्रधारीचा आवाज बंद होणार नाही.

ही लढाई लढता लढता मरण आले तरी बेहत्तर पण या विकृतांचे बुरखे फाडत राहू. त्यांचा दांभिकपणा, त्यांचे असली चेहरे लोकांच्यासमोर आणत राहु. या पिलावळींनी फेसबुकला मोदी-शहा, योगी व फडणवीस समर्थक असे लिहीले आहे. जर मोदी, शहा, योगी व फडणवीस असल्या विकृती जोपासत असतील, शौचलयाच्या टाकीतील या दुर्गंधीने भरलेल्या आळ्या सांभाळत असतील, त्यांच्या आडाने आपले राजकारण रेटत असतील तर हे नेतेपण काय लायकीचे आहेत ते समजते. असली हलकट विकृती जोपासायची गरज अटलबिहारी वाजपेयींना कधी लागली नाही. त्यांनी कधी अफझलखानाच्या रक्ताची असली पैदास पाळली नाही. वाजपेयींनी त्यांचा विचार घेवून राजकारण केले, तो विचार लोकांच्यापर्यंत नेला व तोच सांगितला. विरोधकांच्यावर टिका करताना नेहमी सभ्यता व संस्कृती जोपासली. पण ते या थराला कधीच गेले नाहीत. या विकृतांना पाळणारे सध्याचे बीजेपीचे नेते भारताचा तालिबान केल्याशिवाय सोडणार नाहीत.

भारतीय संस्कृतीची व सहिष्णू परंपरेची वाट लावल्याशिवाय सोडणार नाहीत. त्यामुळे तमाम भारतीयांनी यांना ओळखायला हवे, त्यांना आवरायला हवे. त्यांच्या बेलगाम सुटलेल्या वारूला लगाम घालायला हवा. प्रत्येक सभ्य, सज्जन व सुसंस्कृत माणसाला उद्याचा सुजलाम-सुफलाम भारत हवा असेल, सभ्य व सुसंस्कृत समाज हवा असेल तर या शौचालयातील आयटीसेलवाल्या आळ्यांना आणि त्यांच्या बापांना रोखायलाच हवे. या बांडगुळांच्या भितीने आज शांत बसाल तर तुमचा भविष्यकाळ कठीण गेल्य शिवाय राहणार नाही. गौरवशाली भारत उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. गौरवशाली भारत, भारताची सभ्यता, संस्कृती, सहिष्णूता, इथली बुध्दाची समतेची शिकवण, शिवछत्रपतींचा विचार नष्ट करून या विकृत आळ्यांचे साम्राज्य आणायचे का ? याचा विचार प्रत्येक समजदार नागरिकाने करायलाच हवा.