महत्वपूर्ण बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द..बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.20एप्रिल):- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आज मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. येत्या काही तासांत राज्यात लॉकडाऊन लावला जाईल असा सुतवाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द होणार असून बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, ‘मंत्रीमंडळामध्ये दहावी परीक्षा रद्द करण्याबाबत आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत एकमताने निर्णय झालेला आहे.