सिरसदेवी ग्रामपंचायत अंतर्गत भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत पाणी टंचाईच्या झळा

82

🔹तात्काळ पाणी टंचाई भासत असल्याने टॅकर सुरु करा : ग्रा प सदस्य दिनकर राठोड यांची मागणी

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)

गेवराई(दि.29एप्रिल):-तालुक्यातील सिरसदेवी येथील ग्रापंचायत अंतर्गत येणार्या भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून तिव्र पाणी टंचाई भासत आसल्याने नागरीकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भिरण्याची वेळ आली आहे तात्काळ टॅकर सुरु करावेत अशी मागणी गेवराई तहसिल कार्यालय व गेवराई पंचायत समिती कार्यलयाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रा प सदस्य दिनकर राठोड यांनी केली आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत येथे गेल्या काही दिवसांपासून तिव्र पाणी टंचाई भासत आसल्याने नागरीकांना मोठी गैर सोय होत आहे ग्रा सदस्य दिनकर राठोड यांनी वेळो वेळी प्रशासनास निदर्शनास आणुन दिले आहे अध्याप पाण्याची कुठलीच सोय केली नसल्याने ग्रा प सदस्य दिनकर राठोड यांनी निवेदनाद्वारे पंचायत समिती व तहसिलदार साहेब याना टॅकर सुरु करण्याची मागणी केली आहे ग्रापंचायत स्तारातुन पाणी पुरवठा योजना अथवा बोर अन्य गोष्टी करुन तात्काळ सरपंच यानी काम करावे अशी मागणी होत आहे ग्रापंचायत स्तारातुन पाणी पाणी पुरवठा होत नसल्याने तात्काळ टॅकर सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत