चंद्रपूर (दि.29एप्रिल) रोजी 24 तासात 1064 कोरोनामुक्त,1741 कोरोना पॉझिटिव्ह तर 29 कोरोना बधितांचा मृत्यू

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.29एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408 झाली आहे. सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60 व 68 वर्षीय पुरुष,लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55 व 67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष,वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष,बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष,कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1741 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, चंद्रपूर तालुका 142, बल्लारपूर 104, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 121, नागभिड 39, सिंदेवाही 116, मूल 123, सावली 39, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 45, राजूरा 98, चिमूर 50, वरोरा 128, कोरपना 87, जिवती 15 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 12 मृत्यूसह आज(29 एप्रिल) 561 नवीन कोरोना बाधित तर 603 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.29एप्रिल):-आज जिल्हयात 561 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 603 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20658 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15650 वर पोहचली. तसेच सद्या 4624 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 384 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 12 नवीन मृत्यूमध्ये 55 वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष वडसा, 46 वर्षीय महिला गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष जामगिरी ता. चामोर्शी, 75 वर्षीय महिला वडसा, 62 वर्षीय महिला लाखांदूर जि. भंडारा, 54 वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी, 65 वर्षीय पुरुष कडोली , ता. कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष बोडधा, ता. वडसा, 53 वर्षीय पुरुष इंजेवारी , ता. आरमोरी, 63 वर्षीय पुरुष सिंदेवाही, जि. चंद्रपूर ,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.56 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.38 टक्के तर मृत्यू दर 1.86 टक्के झाला.

नवीन 561 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 136, अहेरी तालुक्यातील 56, आरमोरी 10, भामरागड तालुक्यातील 14, चामोर्शी तालुक्यातील 73, धानोरा तालुक्यातील 17, एटापल्ली तालुक्यातील 18, कोरची तालुक्यातील 10, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 62, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 24, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 28 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 53 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 603 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 179, अहेरी 45, आरमोरी 38, भामरागड 30, चामोर्शी 63, धानोरा 27 , एटापल्ली 50, मुलचेरा 42, सिरोंचा 06, कोरची 30, कुरखेडा 34, तसेच वडसा येथील 59 जणांचा समावेश आहे.