आंबेडकर पॅंथर ऑफ इंडिया A.P.I. द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक नासिक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.16जून):-आंबेडकर पॅंथर ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचे द्वारे माननीय शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देण्यात आले व या निवेदनात म्हटले आहे की शिक्षण हक्क कायदाआरटिई (RTE) च्या चालू२०२१-२२ या शक्षै णिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व प्रवेशानंतर
शाळे मागील पालकांना होत असलेल्या समस्येबाबत निवेदन देण्यात आंबेडकर पॅंथर ऑफ इंडिया या सामाजिक संस्था यांच्या निवेदनात म्हटले आहे की शैक्षणिक हक्क कायदा RTE २००९ ची मागील वर्षी ऑनलाईन प्रक्रिया खूपच उशिरा पणू ण झाली होती.

मागील वर्षी महाराष्ट्र भर RTE च्या ११५४७७ जागा असनू ०९/०१/२०२१ पर्यंत ६८१८९ बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते परिणामी ४७२८८ जागा रिक्त राहिल्या होत्या.हे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेने खूप मोठे होते या या परिस्थितीला कोरोनाचे कारण पढुे केलेगेले. पण जागा रिक्त राहणे हा दरवर्षी चार प्रश्न बनलेला आहे. यावर्षीही चालू शैक्षणिक वर्षासाठी लॉटरी काढण्यात आली असली तरी अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे पालक वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आल्याचे म्हटले आहे

RTE प्रवेश प्रक्रिया कोरूना या पार्श्वभूमीवर आपल्याला काही अडचणी येत आहे याची जाणीव आमच्या संघटनेला आहे पण त्याचबरोबर RTE प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी सर्व पालक वर्गाची व संघटनेची इच्छा आहे व संघटनेच्या वतीने या निवेदनामध्ये समस्या मांडत असून तरी आपण मागण्यांचा विचार करून वंचित व दुर्बल घटकातील मुलांना शैक्षणिक हक्क मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास पगारे व महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता शांताराम भाऊ दुनबळे आधी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते