मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे – “जय महाराष्ट्र”

22

मा.ना.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे (जन्म – २७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.इ.स.२००३ साली मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरेंचे वडील तत्कालीन शिवसेनाप्रमुख आदरणिय बाळासाहेब ठाकरे यांचेकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे देण्यात आली.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले.पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडी चे सरकार स्थापन केले व राज्याच्या २९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

आज २७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश….महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ” मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ असं म्हणत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी शपथ घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीतर्फे मा.ना.श्री.उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.शिवाजी पार्कच्या मैदानात संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या मुहूर्तावर शपथविधी सोहळा पार पडला.मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरेंच्या शपथविधीसाठी फक्त शिवसेनेच नाही,तर काँग्रेस,राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते.

मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये झाला आहे.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली आहे.त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.एक सिद्धहस्त लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे.तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस,शेतकरी,कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे,आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळलेली आहे.

ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली.शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे १९९७ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली.त्यांनी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले.२००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.त्यानंतर २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख आदरणिय बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांचा विवाह मा.सौ.रश्मी ठाकरे यांच्याशी झाला असून त्यांना मा.ना.श्री.आदित्य ठाकरे आणि श्री.तेजस अशी दोन मुले आहेत.मा.ना.श्री.आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवीत आहेत.ते सध्या युवासेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

महाराष्ट्राच्या भौगोलिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते.महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली.आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले.युवक,कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.

मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण केले.विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली.२००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार होते.महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा,विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश.गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी.राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

संवेदनशील लेखक,कवी,अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.तेंव्हा महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना….!!!

✒️लेखक:-राजेंद्र लाड(तालुकाध्यक्ष -शिक्षक सेना,आष्टी,जि.बीड)मो.९४२३१७०८८५