तो तीस लाखांचा पांदण रस्ता गेला वाहून ! कंत्राटदार आणि संबंधित अधिकाराचा सेटलमेंटची जनतेतून चर्चा

36

🔸उन्हाळ्यात बनला होता टेकामांडवा येथील पांदनरस्ता

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.28जुलै):-आदिवासी अतिदुर्गम बहूल तालुका असल्याने शासनाच्या वतीने विकास कामांचे अनेक योजना राबविल्या जातात करोडो रुपयांची निधी रस्ते,पुल, बंधारे, शेततळे,नाले खोलीकरण,समाज भवन, अंगणवाडी इमारत, शाळा इमारत व इतर अनेक बांधकामांवर निधी मंजूर करण्यात येते आणि बांधकामे केली पण जातात, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम २५ जून २०२१ ला पूर्ण झाले होते. मात्र या एकाच महिन्यात या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे तो तीस लाख रुपयाचा पांदन रस्ता या पहिल्याच पावसात वाहून गेला त्यामुळे त्या पांदण रस्ता बांधकामाची चौकशीची मागणी सय्यद शब्बीर जागीरदार शेतकरी संघटना तालुकाप्रमुखानी केली

ग्रामपंचायत टेकामांडवा येथे रस्त्याचे काम विविध योजने अंतर्गत होत आहे. रस्त्यामुळे गावाच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होते. पण लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या मनमानी कारभारा मुळे गावाच्या विकासाला चालना मिळत नाही आहे असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसून येत आहे.
शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामा कष्टातून उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच झाले आहे. विकास कामाला विरोध नाही. पण निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची.

गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य वापर होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी संबंधित अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी आगळे वेगळे आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत टेकामांडवा येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची आणि जिवती तालुक्यातील अनेक योजने अंतर्गत जे विकासाची कामे झाली आहेत,व जे सद्या बांधकाम व इतर कामे सुरू आहेत या सर्व कामांची योग्य ती विभागीय चौकशी करा अन्यथा शेतकरी संघटना जिवती तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे