बुलडाणा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची मा ना अब्दुल सत्तार साहेब यांनी केली पाहणी

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.14सप्टेंबर):- विशेष प्रतिनिधी अंबादास पवार
बुलडाणा तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. आज दि १४/९/२०२१ रोजी राज्याचे महसूल राज्यमंत्री मा ना अब्दुल सत्तार साहेब यांनी बुलडाणा तालुक्यातील सागवन व पाडळी या भागातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मा ना अब्दुल सत्तार साहेब यांच्यासोबत मा खा प्रतापराव जाधव साहेब अध्यक्ष केंद्रीय ग्रामविकास समिती भारत सरकार, मा आ डॉ संजयजी रायमुलकर , मा आ संजयजी गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा कृषी अधिकारी श्री नाईक साहेब, तहसीलदार श्री खंडार साहेब, गट विकास अधिकारी श्री सावळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीवर पंचनामे करून तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री महोदय यांनी दिल्या.

तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती ही पुराच्या पाण्याने खरडून गेली त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून मदतीसाठी मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले.याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, की से उप जि प्र बाळासाहेब नारखेडे, कृउबा मा संचालक श्रीकांत पवार, तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप ता प्र अमोल शिंदे, विजय इतवारे, सागवन व पाडळी गावचे सरपंच उपसरपंच, शेतकरी, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.