शेतकऱ्यांच्या सन्मानात काॅग्रेस मैदानात

29

✒️तालूका प्रतिनिधी(महादेव उप्पे)

देगलूर(दि.२७सप्टेंबर):- मोदी सरकारच्या देश व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना समर्थन देत, देगलुर शहर व तालुका काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस देगलुर शहर व तालुक्यातील सर्व शेतकरी तहसीलदार कार्यालयासमोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला आणि बंदला पाठिंबा दिला. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कृषी कायद्यांविषयी आंदोलन सुरू असताना तिकडे सरकार दुर्लक्ष करते.

तसेच सोयाबीनचे उत्पादन वाढले असताना परदेशातून सोयाबीन आयात करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडते असे हे शेतकरी विरोधी सरकार आहे. या विषयावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख, शहर अध्यक्ष शंकरराव कंतेवार, नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरशेटवार,जि.प.स.दिलीप बंदखडके, नगरसेवक बालाजी टेकाळे,विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिरादार,विष्णुकांत पाटील, उपाध्यक्ष बालाजी पा.थडके,पेंटय्या सेठ, दिनेश वैश्नव,रवी मोरे,खुशाल पाटील,भाऊसाहेब मरतोळीकर, रमेश शिवणीकर,प्रशांत पाटील, ताराकांत पाटील,संजय मठपती, अजीम शेख, शेषेराव नाईक, राजेंद्र पाटील, राजु पाटील,रुपेश पाटील, सुजात देसाई व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होत.