आक्रम सौदागर यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांना,पिकविमा आतीवृष्टी नुकसान भरपाई सह गाव तलाव व पांदन रस्ते दुरुस्ती संदर्भात दिले निवेदन

53

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.28सप्टेंबर):- तालुक्यात दिं 31 आगष्ट पासुन ते आज पर्यंत आतीवृष्टीचा जोर कायम असुन तालुक्यातील तलवाडा व परिसरातील गावा मध्य मोठ्या प्रमाणात शेतातील माती सह पीके वाहुन गेली असुन पिकविम्याचा मुद्दा ही एैरणीवर असुन तलवाडा गाव तलाव जवळपास 80 एक्करच्या परिसरात पसरलेला आसल्याने व तो कधीही फुटन्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तलवाडा ग्रामपंचायतचे ऊप सरपंच आक्रम सौदागर (आज्जुभाई ) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मा. ना. श्री जयंत पाटील यांना निवेदन दिले

असुन तलवाडा गाव तलाव संरक्षण भींत चारही बाजूने पक्के बांधकाम करण्यासंदर्भात अर्वजुन निवेदनात उल्लेख करत पिकविमा, आतीवृष्टी मुळे शेतक-यांना आर्थिक भरपाई व शेतात जाणारे पांदन रस्ते तात्काळ करन्याची मागणी राष्ट्रवादी सेवा दल कांग्रेस पार्टीचे गेवराई तालुका अध्यक्ष व तलवाडा ग्रामपंचायतचे ऊप सरपंच आक्रम सौदागर (आज्जुभाई ) यांनी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.