धनगर आरक्षणाच काय झालं? केंद्रीय मंत्र्यांना विचारला जाब

28

🔸धनगर युवक गंगाखेडात आक्रमक

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3ऑक्टोबर):-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गंगाखेड जि परभणी येथे आले असता भरसभेत त्यांना धनगर आरक्षणाचे काय झालं अशी ठळक अक्षराची पत्रके वाटून व विचारून धनगर समाजाच्या वतीने रविवारी जाब विचारण्यात आला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी च्या निमित्ताने गंगाखेड जिल्हा परभणी येथे आले होते .भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानासमोर छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मंत्री दानवे बोलत असताना धनगर समाजाच्या युवकांनी धनगर आरक्षणाचा काय झालं असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री दानवे साहेब सहित उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांना पत्रके वाटण्यात आली.

हा दौरा पिक नुकसानीची पाहणीसाठी असून धनगर आरक्षणासाठी मुद्दाम दौरा काढून तुम्हाला भेटायला देऊ असे मिश्कील उत्तर मंत्री दानवे यांनी दिले. धनगर समाजाचे कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे यांनी समाजाच्या वतीने हे निवेदन पत्रके देण्यात आली. यावेळी ह भ प शिवाजी महाराज बोबडे, मुंजाभाऊ कूगणे, लक्ष्मण देवकते, आनंदराव बनसोडे, आश्रुबा करवर ,शिवाजी करवर ,मनोहर मुलगिर , सय्यद मुदस्सीर, शेख सोहेल, उपाडे उपस्थित होते.