आईवडीलासारखा परमात्मा आपल्याला सांभाळतो- हभपश्री किशोर महाराज सिरसाट

26

 ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.18ऑक्टोबर):-नाशिवंत असलेला देह व येथील नश्वर वस्तु मृत्युलोकातुन जातांना काहीही बरोबर नेता येत नाही,देता देववीता नेता नेवविता! तेथे याची सत्ता काय आहे!!मग धन कपाटातच राहते,पशु गोठ्यातच,धान्य कोठीतच,पत्नी दारापर्यंतच येते,नातेवाईक स्मशानापर्यत, मृतदेह चितेपर्यंत येत असतो तर जीव कर्म मार्गाने पुढचे गतीचा प्रवास करतो,याकरीता संसारात आपण आई-वडील संत सदगुरु व देवावर विश्वास ठेऊन वाटचाल केली तर हरिभक्त माझे जीवलग सांगाती!सांभाळुनी नेती परलोका!!

अर्थात शेवटी फक्त संत सदगुरु व परमात्माच आपला सांभाळ करतात असे विचार नाशिक शहर वारकरी महामंडळ संपर्कप्रमुख हभपश्री गुरुवर्य किशोरजी महाराज सिरसाठ यांनी मखमलाबाद येथे वै.कमळाबाई काशिनाथ दिघे यांना श्रध्दांजली वाहतांना व्यक्त केले.यावेळी नाशिक वारकरी महामंडळ अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांचे आईमुलामुलीच नात किती घट्ट असत, देह किती नश्वर असतो, याच त्यांनी चिंतन मांडल,शेवटी विश्वकर्मा मंडळ सातपुर चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब राजगुरु यांनी आभार मानले.कार्यक्रमास श्री मधुकर भागवत,श्री किरण पेंढारकर,राजु दिघे,मनोहर दिघे,प्रशांत दिघे,शकुंतला भागवत,मीना राजगुरु,संगीता पेंढारकर व आप्तेष्ट भाविक प्रवचनास उपस्थित होते.