आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही; त्यामुळे भाजप गेवराईत पुन्हा आंदोलन छेडणार

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.23ऑक्टोबर):-आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही तुटपुंजी असल्याचं, आमदार लक्ष्मण पवार यांनी बीड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटल आहे.राज्य सरकारने बागातदार, कोरडवाहू आणि फळ बागायतदार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र ज्यांच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या अशा शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा सवाल यावेळी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ मागितला असता ते भेटण्यासाठी वेळ देत नसल्याचे देखील पवार यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा भाजप आंदोलन छेडणार आहे.
वेळ पडलीच तर पदाचा राजीनामा देखील देऊ असं यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले आहे.