✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनिधी)
नेरी(दि.26ऑक्टोबर):-येथून जवळच असलेल्या वडसी ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच पार पडली.ग्रामसभेत शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. गावातील समस्या नागरीकांनी मांडल्यानंतर त्यावर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अजय देवराव चांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अजय चांदेकर हे स्पष्ट बोलणारे व्यक्ती मत्व असुन गावातील समस्या तरुण युवकांना सोबत घेऊन व गाव विकासासाठी सदैव अग्रेसर आहेत.
झगडे तंटे मिटवण्यासाठी त्यांचे सहकार्य लाभणार आहे त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल धनराज मेश्राम, निखिल मेश्राम, ज्ञानेश्वर मेश्राम, राजेंद्र रंदये,सौ रिना पाटील ग्रा.प.सदस्य,श्रिकात गेडाम, नवनित मेश्राम,आशिष आत्राम, नितेश आत्राम,शिहरी शेंडे,शुभम जांभुळे , शत्रुघ्न बारेकर, राकेश सुर्यवंशी आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.