सरस्वती महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव निमित्त स्वच्छ भारत अभियान

31

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.31ऑक्टोबर):- जिल्ह्यातील केज तालुक्यातील माऊली विद्यापीठ संचलित सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला.

प्राचार्य डॉ. पाटील जी. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे भाऊसाहेब पाटील बी एड कॉलेज प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जाधव जे. के. डॉ. कराळे एन. बी. विद्यार्थी स्वयंसेवक व महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ करण्यात आला.

तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील जी. बी. यांनी विद्यार्थी स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगताना आपण सर्वांनी आजादी का अमृत महोत्सव निमित्त आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा जर आपण आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवला तर आपले आरोग्य चांगले राहील असे नमूद केले.स्वच्छता उपक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचेआभार डॉ. कराळे एन. बी. यांनी मानले