पोलीस भरतीत परीक्षेला मिळाले कमी गुण तरुणांनी विष प्राशन करून केली आत्महत्या

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.24नोव्हेंबर):-पोलीस भरतीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.राहुल भानुदास चौगुले (वय 22, रा . एक्सलो पॉईंट, अंबड)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल याने गत आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या भरतीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. तो राहुलने ऑनलाइन बघितला असता त्यात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला होता. मनापासून सर्वतोपरी लेखी व मैदानी परीक्षेची तयारी कमी गुण मिळाल्याने त्याची मानसिकता खालावली. त्याने शनिवारी (दि.२०) रात्री विषारी औषध सेवन केले. त्याला त्रास सुरू झाल्याने भानुदास चौगुले यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि.२१) सकाळी मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.