क्रांतीमता तू उजळलास
अंधार पसार झाला.
संविधान तेज पेरलास
भारत प्रजासत्ताक झाला…
ज्ञानप्रज्ञा तू आत्मलास
अज्ञान दूर केला.
वाघिणीचे दुध पिऊनी
जुलमाचा नाश केला…
माणूसकिचे दीप होऊनी
विकृतीचे मेंदू ठेचला.
इतिहासावर स्वार होऊनी
विषमतात्वांची शेंडी तोडला..
मानवमुक्तीचा युगंधर बनुनी
धम्मचेतना हृदयात तेवला.
स्वातंत्र्याचा महासूर्य होऊनी
गुलामगिरीच्या बेड्या तोडला…
निळ्या पांखराची ऊर्जा बनुनी
भारताचे संविधान लिहला.
लोकशाहीचा मळा फुलवूनी
एकात्म भारत घडला.
क्रांतीयुध्दाची महान ऊर्जा
भारतीयांच्या मनगटात दिला.
अन्यायावर वाचा फोडूनी
आत्मभानाची अणुऊर्जा दिला.
✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००