आधिच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर ही वेळ आली नसती.:- रिपाई डेमोक्रॅटिक

23

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.3मे):-आधीच राज ठाकरे यांना अटक करून भाषण बंदी केली असती तर आज जशी वेळ आली आहे ती आली नसती. असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सोसिएल मीडिया द्वारे व्यक्त केले.

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, दि 19 एप्रिल 2022 रोजी राज्याचे सन्माननीय राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री श्री उद्धव यांना, गृहमंत्री व पोलीस आयुक्तांना ईमेल करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करुंन् भाषण बंदी करण्याचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या समाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले होते, त्यावेळीच मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या मुस्क्या आवळल्या असत्या तर औरंगाबादची सभा झाली नसती ना आज वातावरण चिघळले असते.

अजूनही वेळ गेली वाटत आणी राज ठाकरे यांना अटक केल्यास महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल अस काही नाही त्यामुळे जस राणा दाम्पत्यांना देशद्रोहा च्या आरोपाखाली अटक करून जेर बंद केले तसेच राज ठाकरे यांनाही अतिरिक्त कलमानव्ये अटक करून जेरबंद करावे, ज्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाच्या प्रमुखांची प्रक्षोभक भाषण करून जातीय दंगली उसळवण्याची हिम्मत होणार नाही असेहि मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.