सावरगाव ग्राम पंचायत मधिल रोजगार हमी योजनेतील भ्रष्टचाराची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाही करा- आम आदमी पार्टी ची मागणी, आंदोलनाचा ईशारा

30

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.9जून):-सर्वसामान्य गरीब कुटुंबाला रोजगार मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला जागोजागी भ्रष्ठ अधिकारी व काही राजकारणी यांच्या संलग्नतेने भ्रष्ट्राचाराचे केंद्र बनविले जात असतांना दिसते. चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भ्रष्ट्राचार व कामात दिरांगाई होत असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांना अर्जाद्वारे दिली होती परंतु कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाही करण्यात यावी अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा ईशारा आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकार्यांना इमेल द्वारे करण्यात आले.

आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी जिल्ह्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रामध्ये सावरगाव ग्राम पंचायत मधिल रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराची माहिती दिली यात काही मजूराना ऐकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केल्याचे दाखऊन त्यांची मजूरी काढ़ने, शाशनाकडून पैसा वसूल करण्याकरीता बनावट मश्टर तयार करने आणि मजूर कामावर नसताना मजूरी लावणे, मेजरमेंट नुसार कामे न करने, अश्या विविध प्रकारानी भष्टाचार करन्यात आला आहे.

सावरगांव ग्राम पंचायत मध्ये कामाची मोजनी झाली असता हपत्याच्या पेमेंट मध्ये तफ़ावत झाली आहे पेमेंट काढ़ताना काही मजूरांचे पेमेंट जास्त तर काही मजूरांचे पैसे कमी काढण्यात आले, बोड़ी खोलिकरणाच्या कामात मश्टर वरील काम अलग व प्रत्यक्षात काम बघितल्यास कामात तफ़ावत दिसून येत आहे, सन २०२१-२२ मनरेगा अंतर्गत शोषखड्याचे बाँधकाम निकृष्ट दर्जाचे व कामात भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसून येत आहे. शोषखड्डे तयार करताना वाटेल त्या ठिकाणी शोष खड्डा तयार करने, ड्रम फिट करने व मटेरियल टाकून एक साधा पीव्हीसी पाइप जोडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रकार सावरगांव ग्राम पंचायत मधे झाले आहे, ७० ते ७५ वर्ष वयोगाटातील मजुरांचे चे नावे टाकून यांचे नावावर मजुरी स्वरुपात पैश्याची उचल केली आहे, बोड़ी खोलिकरन व शोष खड्याचे संदर्भात कार्यालयीन चौकशी अंती शासकीय स्तरावरुन संबंधित जिम्मेदार पदाधीकारी, सचिव, रोजगार सेवक व संबंधित यंत्रणा यांचेवर करण्यात यावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य सौ, निषा कुमरे, सौ, लता दडमल, तसेच गावातील नागरिक शंकर ताम्बरे, नरेंद्र नवले, विजय मेश्राम, हेमराज झालवड़े, रामकृष्ण झोड़े, पांडुरंग दडमल, पुष्पा झालवड़े, वृंदा जीवतोड़े, शालू पडवे, रोशन मुरकुटे, विनोद भरडे, अरुण नाकाडे, श्रीकांत नाकाडे, राजेंद्र शेंदरे व अन्य गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना अर्जाद्वारे केली होती परंतु कोणतीही कारवाही केली गेली नसल्यामुळे अनेक प्रश्न व शंका उपस्थित होत आहेत.

या प्रकरणात त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाही करा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा आम आदमी पार्टीतर्फे देण्यात आलेला आहे.