विकास तिर्थ बाईक रॅलीचे तळेगाव येथे भव्य स्वागत

32

✒️तळेगाव,शा.पं,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

तळेगाव शा.पं(दि.14जून):-आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतेच आठ वर्षं पूर्ण झाले. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात नेतृत्वात सर्वसामान्य गरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना या आठ वर्षांत सुरू करण्यात आल्या. या सर्व योजनांची समस्त जनतेला माहिती व्हावी या उद्देशाने सेवा, सुशासन, गरीब कल्याण पंधरवाडा अभियान वर्धा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने भाजयुमो वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री वरूनभाऊ पाठक यांच्या नेतृत्वात विकास तिर्थ बाईक रॅली काढण्यात आली आहे.या रॅलीची सुरुवात आष्टीच्या शहीद स्मारक येथील शहीदांना अभिवादन करून करण्यात आली.

यावेळी आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री दादारावजी केचे, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री सुनिलजी गफाट, माजी खासदार श्री सुरेशराव वाघमारे, जिल्हा महामंत्री श्री अविनाशजी देव, भाजपा तालुका अध्यक्ष श्री कमलाकर निंभोरकर, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्री वरूनभाऊ पाठक, भाजयुमो प्रदेश सचिव श्री अंकुशभाऊ ठाकुर, जिल्हा महामंत्री श्री अवेज खान, भाजयुमो विधानसभा प्रमुख गजानन भोरे, भाजयुमो आष्टी तालुका अध्यक्ष श्री रोषण मानमोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आष्टी वरुन ही रॅली तळेगाव येथे पोहचली त्यावेळी रॅलीचे उड्डाण पूलाखाली भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्या सौ. अंकिताताई होले, भाजपा जिल्हा सचिव श्री सचिनजी होले, सरपंच सौ. छबुताई खंडार, उपसरपंच त्रिशुल भुयार, राहुल बुले, दत्ता पुसदेकर, नवाज पठाण, सुनिल कळसकर, चिस्तुर येथील मंगेश खारकर, विजय काळे, देवानंद शेळकी, बेलोरा येथील सरपंच सौ.योगीता ठाकरे, निरंजन वानखडे, अमोल सरदार इ.सह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन देवानंद डोळस यांनी केले.