अखेर अंबाजोगाईकरांच्या मनातील आक्रोश रस्त्यावर; ऐतिहासिक मोर्चाने शहर ठवळले

28

🔸अंबाजोगाई न.प.प्रशासन मूलभूत सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले

✒️अंबाजोगाई प्रतिनिधी(शेख फेरोज)मो:-7020475287

अंबाजोगाई(दि.14जून):-नगर पालिकेच्या सदस्याचा कार्यकाळ संपल्यामुळे पालिकेवर सध्या प्रशासकाचे अधिराज्य आहे. परंतु प्रशासक शहराला मुलभूत सुविधा पुरवण्याऐवजी इतर कामातच व्यस्त असल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.ऐतिहासिक गजर मोर्चाने अखेर अंबाजोगाईकरांच्या मनातील अकोश रस्त्यावर उतरला होता दि.१४ रोजी मंगळवारी सर्व पक्षीय भव्य गजर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात शहरातून हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे पालिकेच्या प्रशासकाची पुर्णतः नाचक्की झाली. शहरातील विकस्ळीत पाणी पुरवठा,प्रलंबित घरकुलाचे हप्ते, भोगवटा धारकांना घरकुल,स्वच्छता कंत्राटी कामगारावर होणारा अन्याय तसेच महिला उपनगर अभियंत्यासोबत प्रशासकाने केलेले गैरवर्तन यामुळे अंबाजोगाई शहराची राज्यभर प्रतिमा मलिन झाली आहे.सध्या नगर परिषदेत प्रशासक आहे का? सत्ताधारी असा प्रश्‍न अंबाजोगाईकरांना पडल्याने या आंदोलनाने संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधले होते.

अंबाजोगाई शहरातील पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई झाली नाही,पुरस्थिती निर्माण होणारे नाले. हे मे महिन्याच्या आखेरपर्यंत साफ करणे गरजेचे होते. परंतु या सर्व पालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शहराची ओळख दुर्गंधीचे शहर अशी निर्माण झाली आहे.विविध पक्ष,संघटनांनी निवेदन देऊन,आंदोलने करून देखील प्रशासक आठ-आठ दिवस कार्यालयाकडे फिरकत नसल्यामुळे विविध नागरी समस्यांनी तोंड वर काढले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यामुळे शहरातील नाल्यांना पुर आल्यावर बहुतांशी घरे पाणी खाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.वादग्रस्त मुख्याध्यधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात घाणिचे साम्राज्य पसरले असून येत्या काळात शहरात मोठी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे,दर चार दिवसाला पाणी पुरवठा करण्याऐवजी आठ ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे.

धनेगावच्या धरणात मुबलक पाणी साठा असतानाही नगर परिषद प्रशासन जनतेला वेठीस धरण्याचे काम करींत आहे.घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते त्वरीत देण्यात यावेत. शहरातील पथदिव्यांची विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. भोगवटा धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा. गेल्या महिना भरापासुन पालिकेने स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या एजन्सींच्या कामगार संपावर गेल्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्‍न आवासुन बसला आहे. नगर परिषदेतील उपनगर अभियंता महिला कर्मचाऱ्यांसोबत मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी गैरवर्तन केल्याने संबंधित पिढीत महिला अधिकार्‍याने राज्य महिला आयोगाकडे धाव घेऊन तक्रार केली आहे तरी देखील सुस्थावलेला प्रशासक आजही तो त्याच्या तोर्‍यातच आहे.अंबाजोगाई नगर परिषदेची कधी नव्हे ती एवढी बदनामी या प्रशासकामुळे जिल्हाभर झाली आहे.वरील सर्व विषयांवर आवाज उठविण्यासाठी तसेच सुस्तावलेल्या नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी मी अंबाजोगाईकर या बॅन खाली भव्य असा गजर मोर्चा काढण्यात होता,या मोर्चात शहरातील विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या भव्य गजर आंदोलनात सहभाग नोंदविला होता.या आंदोलनामुळे शहरपुर्ण ढवळून निघाले आहे.भव्य गजर आंदोलनाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकाला अभिवादन करून करण्यात होती, हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – नगर परिषद- बसस्थानक-पाटील चौक- मंडी बाजार- गुरूवार पेठ- छत्रपती शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे नगर परिषद प्रशासनाची मोठी भंबेरी उडाली होती.अंबाजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांच्या अनागोंदी कारभार सुरू असून त्याची तात्काळ चौकशी करून वादग्रस्त मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निलंबित करण्यात यावे.

ही प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती.या आंदोलनात केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल लोमटे,नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक,भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी तालुकाध्यक्ष अच्युत गगणे,दिलीप सांगळे,अनंत लोमटे,संजय गंभीरे,डॉ.अतुल देशपांडे,दिलीप काळे,सुरेश कराड,शिवसेनेचे अर्जुन वाघमारे,शहराध्यक्ष गजानन मुडेगावकर,काँग्रेस पक्षाचे असिफोदिन खतीब, दयानंद कांबळे, ईश्वर शिंदे,रिपाईचे महेंद्र निकाळजे, माजी नगरसेवक शेख नबी,सुरैय्या चौधरी,वंचीतचे शैलेश कांबळे, गोविंद मस्के, वंचित चांदभाई शेख,उमेश शिंदे, (लो ज पा) राजेश वाहुळे एम.आय.एम.चे रईसोद्दीन अन्सारी,व डॉ.सुधीर धर्मपात्रे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.