मुंबईतील कोळीवाडे गावठाणांच्या पुनर्विकासासाठी 5 एफएसआय देण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

26

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.19जून):- मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आदिवासी पांडे;आगरी कोळीपाडे; गावठाण्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सध्या 1.5 असलेला एफ एस आय वाढवून 5 एफ एस आय द्यावा या मागणी सह आगरी कोळी समाजाच्या मुंबईतील गावठाणांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात कोळी आगरी आघाडी चे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे कोषाध्यक्ष आणि रिपब्लिकन आगरी कोळी आघाडी चे अध्यक्ष ऋषी चिंतामण माळी यांनी दिली. बांद्रा येथील कार्यालयात केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची रिपाइं चे राज्य कोषाध्यक्ष ऋषी माळी आणि रिपाइं चे मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांनी भेट घेऊन गावठाणांच्या विकासाबाबत च्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी गावठाण विकासाबाबत आपण लवकर मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठविणार आहोत आणि त्यांची भेट ही घेणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.

मुंबईतील गावठाण आणि आदिवासी पाडे स्वातंत्र्य पूर्व काळापासून शंभर वर्षांहून अधिक जुने आहेत. या गावठाणांच्या सीमारेषा राज्यशासनाने अद्याप निश्चित केल्या नसून या गावठाण आणि आदिवासी पड्यांचे सर्व्हेक्षण करून गावठाणांच्या सीमारेषा निश्चित कराव्यात.

एस आर ए च्या धर्तीवर स्वतंत्र गावठाण विकास प्राधिकरण स्थापन करून गावकऱ्यांच्या इच्छेनुसार विकासक निवडून गावठाणांचा विकास करावा. गावठाण विकसित करण्यासाठी सी आर झेड च्या कायद्यातील अटीं शिथिल कराव्यात. कोस्टल रोड बनविण्यासाठी सी आर झेड कायद्यातील नियम शिथिल केले आहेत तसेच गावठाण विकसित करताना सी आर झेड नियम शिथिल करावेत. गावठाण विकसित केल्यानंतर उभ्या राहणाऱ्या इमारती घरांना आदिवासी आगरी कोळी भूमीपुत्रांची घरे म्हणून असेसमेंट टॅक्स माफ करावा. मुंबईत 500 फुटांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करण्यात आला आहे तसेच गावठाणांच्या घरांना असेसमेंट टॅक्स माफ करावा.त्यामुळे गावठाणांच्या विकासाला कोणीही विरोध करणार नाही या मागण्यांचे निवेदन केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना देण्यात आले असल्याची माहिती ऋषी माळी यांनी दिली.