नगर परिषदच्या ढ़ीसाळ नियोजनामुळे चिमूर शहरातील प्रभागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात नागरिकांनी केलेल्या तक्रारीकड़े दुर्लक्ष

26

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.7जुलै):-चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधिल काळकुळ नगर मध5 पाणी साचल्याने प्रभागातील आरोग्य धोक्यात आले असून प्रभागातिल नागरिकांना प्रत्येक मूलभूत गरजांसाठी वेळोवेळी सामना करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार लेखी- तोंडी निवेदन देऊन सुद्धा नगर परिषद दुर्लक्ष करून नागरिकांचे आरोग्यासी खेळत आहे.चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील काळकुळ नगर ही वस्ती वडाळा ग्राम पंचायत मधे सामाविष्ट होती. 8 वर्षापूर्वी वडाळा ग्राम पंचायत चिमुर नगर परिषद मध5 सामाविष्ट केल्यामुळे नगरपरिषदचे या प्रभागात दुर्लक्ष झाले आहे, या प्रभागात पिण्यासाठी नळाना अशुद्ध पाणी येणे ही नियमित बाब आहे. सर्वात मोठा प्रश्न सांड पाण्याचा या ठिकाणी निर्माण झाला आहे, सांडपाणी व आभाळाचे पाणी इथे भरपूर प्रमाणात साचले मुळे डासानचे प्रमाण भरपूर प्रमानात वाढले आहे.

प्रभागातिल प्रत्येक घर जलमय झाले असून प्रत्येक घरासमोर गटारी निर्माण झाल्या आहे, याच प्रभागात गावटी डुकर गटारी मध्ये वास्तव्य करीत आहे, त्यांच् बरोबर सार्वजनिक रस्त्यावर गुरे ढोर बांधत असल्यामुळे नागरिकांना जाणे-येणे करणे कठीण झाले आहे. मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, सर्वात जास्त मंजूर वर्ग या प्रभागात राहत असून तेथील सार्वजनिक नळ सुधा घाणीच्या साम्राज्यात आले आहे, या बाबत वारंवार चिमूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुधा या प्रभागात कोनतेच नियोजन करण्यात आले नाही, त्यामुळे नागरिक आन्दोलनाच्या तैयारीत आहे, तीन ते चार दिवसात नगर परिषदेने आरोग्यासी खेळने थंबविले नाही तर नगर परिषद सामोर आंदोलन करू असा इशारा सुधा नागरिकांचे वतीने देण्यात आला आहे,
====================
” काडकूड नगर येथील समस्या बाबत मि वारंवार नगरपरिषद मुख्याधिकार्याना ऑफिस मधे जाऊन माहिती दिली, अजूनपर्यंत यावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, या दोन चार दिवसात जर आमच्या समस्या मार्गी लागल्या नाही तर आम्ही नगरपरिषद सामोर आमरण उपोषण करू- सूरज नरुले, शहर महामंत्री भारतीय जनता पार्टी