शेतकऱ्यांची पोरं झेड.पी. पंचायत समिती मध्ये गेली पाहिजे – अतुल खूपसे-पाटील

28

✒️ नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(मोहोळ)(दि.1ऑगस्ट):-दि.30 रोजी मेळाव्यात बोलताना खुपसे पाटील म्हणाले कि करमाळा तालुक्यातील जि.प.च्या 6 तर पंचायत समितीच्या 12 जागा जनशक्ती शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे अशी घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील यांनी केली.

आज दि.30 जुलै रोजी सकाळी 11 वा. करमाळा येथील दत्त मंदिर येथे संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ही घोषणा त्यांनी केली.बैठकीच्या सुरवातीला करमाळा तालुक्यातील इच्छुक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आपआपली मनोगते व्यक्त करुन ही निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अतुलभाऊ खुपसे पाटील म्हणाले की, जनशक्ती शेतकरी संघटना ही जात-पात, धर्म, पंथ, न माननारी संघटना असून मानवता हाच धर्म माणून समाजातील अठरापकड जातीच्या धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी काम करणारी संघटना आहे.

या संघटनेच्या माध्यमातून सत्तेवर ज्यांची मक्तेदारी आहे ही मक्तेदारी नष्ट करण्यासाठी गोरगरीब, कष्टकरी घरातील उमेदवारांना निवडणूकीमध्ये उभे करुन त्यांना सत्तेवर बसविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे असे स्पष्ट करुन खुपसे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील जनतेने आता पर्यंत आ.शिंदे, माजी आ.पाटील, माजी आ.बागल यांना मते देवून मोठे केले त्यांनी सत्तेचा उपयोग जनतेसाठी नव्हेतर स्वत:च्या कुटूंबासाठी केला. आज तालुक्यातील जनता आपल्या कामासाठी तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, वीजमंडळ, पंचायत समिती, या सह अन्य शासकीय कार्यालयात गेल्यावर त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांचे काम होत नाही. एका कामासाठी चार चकरा मारुनसुध्दा ही कामे होत नाहीत. मात्र हे चित्र बदलण्यासाठी तळागाळातील संघटनेच्या कार्यकर्त्याला जर सत्तेमध्ये बसवून काम करण्याची संधी दिली तर सर्वसामान्याचे प्रश्न सुटल्या शिवाय राहणार नाहीत. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून उभा करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी तालुक्यातील परांपराकी राजकीय गटाच्या नेत्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.या मेळाव्यामध्ये तात्या भोसले, नितीन जगताप, अतुल राऊत, दत्ता कोकणे, दिपाली ढेरे, शरद एकाड, वैभव मस्के, पांडू भोसले, बालाजी तरंगे, किशोर शिंदे, रामराजे ढोलारे, अक्षय देवडकर, स्वातीताई जाधव, गणेश वायभासे आदिंची भाषणे झाली.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राणा महाराज वाघमारे यांनी केले. तर आभार शरद एकाड यांनी मानले.या मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.