✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.3सप्टेंबर):-तालुक्यातील गुडसेला येथील शेतकरी व किराणा दुकानदार शरफुददीन शेख यांचे घरी स्वयंपाक झाल्यानंतर चुलीतील कोलीत जळत राहील कधी आणि कसे झाले काही माहीत नाही पण घरातील घरगुती साहित्य,कपडे समान जाळून खाक झाले.तसेच त्यांचे कडे असलेले किराणा दुकानाला सुद्धा आग लागून दुकानातील किराणा माल जळून खाक झाले.गावकऱ्यांनी गोळा होऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आग आटोक्यात आणली.त्यात शरफुददीन शेख यांचे घराचे व किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले..
अत्यंत गरीब परिस्थीत कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असताना अचानक झालेल्या या घटनेने कुटुंबाचे मनोबल खचलेले आहे.सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे सदर घटनेची चौकशी करून पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी हक्कानी शेख तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवती यांनी केली आहे