कष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थान माता रमाई आणि सुशिक्षित महिलांचे ?

26

महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने का दिसतात?कोणत्या सरस्वतीने त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले होते?.तिला यासाठी तिच्या पतीने मदत केली होती काय ?.तिचे शिक्षण कुठे कधी झाले होते?.जन्म कधी?. कुठे? कसा झाला होता.गांव,तालुका,जिल्हा,राज्य देश कोणता होता यांचा कोणत्याही पुरावा उपलब्द नसतांना महिलांना सरस्वती कशी प्रसन्न होत असते.त्या सुशिक्षित महिलांचे प्रेरणा स्थान कोणते असते. तरी शाळा कॉलेज मध्ये तिचा उदोउदो नियमितपणे होत असतो.शिक्षण घेऊन ही हे अज्ञान दूर का होत नाही.कष्टकरी महिला नेहमी आपल्या पतिदेवला सर्वच कामात सतत मदत करीत असतात अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई. माता रमाई बाबत जन्मा पासून मृत्यू पर्यंत आज पुरावे उपलब्द आहेत. आज प्रयन्त माता रमाई बाबत अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्ट त्यागाला भावनिक केल्या गेले आहे. महिलांना समान न्याय, हक्क, अधिकार मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण संघर्षात जिचा सिंहाचा वाटा होता. अशा माता रमाई सर्वच महिलांच्या प्रेरणास्थान असायला पाहिजेत.

भिमराव आंबेडकर यांना रमाईची जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मना पासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पड़यातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात. पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही. त्याची त्यांना जाणीव नाही. रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?.रमाबाई बदल जेवढा आदर अडानी असंघटित महिला पळतात तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला पाळत नाही.अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि माफी सुद्धा )आज प्रयन्तचा इतिहास आणि अनुभवा वरुन हे लिहतो.प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो तसाच एका अपयशस्वी पुरुषा मागे एका महिलांचा हात असतो.मग घराघरत असलेल्या सुशिक्षित महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?

रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेबुवारी १८९८ ला झाला होता. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नांव भिकू धुत्रे (वलंगकर) व आईचे नांव रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळ जवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत होते. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारा पर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले.

सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये १९०६ या वर्षी झाले होते. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालवयातच लग्नाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.पुढे तिला परिस्थितीशी खूप संघर्ष करावा लागला.त्यामुळेच ती आज माता रमाई म्हणून ओळखली जाते.आणि कष्टकरी महिलांचे प्रेरणा स्थान झाली आहे.

रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो. असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही.त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवरया बदल राई चा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा मंत्र आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती.आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.रमाबाई वर असे प्रसंग किती वेळा आले.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाई ची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. पण काय वर्णन करून ठेवले आल्या थोर विचारवंतांनी??

रमाबाईची रमाई कशी झाली किती लोकांना माहित आहे. बाबासाहेब शिक्षणा करिता आणि समाजाला मान सन्मान मिळवून देण्या करिता सतत ब्रिटिशांच्या बरोबर पत्रव्यवहार आणि गाठी भेटी घेत असत. असे एकदा राजगृहावर बाबासाहेब व रमाबाई राहत असताना त्यांना अचानक परदेशी महत्वाच्या कामानिमित्य जायचे होते.पण रमाबाईला एकटे सोडून कसे जाणार हा प्रश्न पडला होता.तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या एक मित्र धारवाडच्या वराळे काका कडे रमाबाईला पाठवितात.धारवाडचे वराळे काका मुलाचे वसतिगृह चालवीत होते त्याच्या आवारात नेहमी लहान मुले खेळायला येत असत.रमाबाईला दोनचार दिवसात मुलांचा लळा लागला.नेमके तीन दिवसा नंतर आवारात मुलाची किलबिलाट दिसली नाही.वराळे काका चिंतेत दिसतात.म्हणून रमाबाई काका ना विचारतात मुले दोन दिवसात आवारात खेळताना दिसत नाही.कुठे गेली का?.तेव्हा वराळे काका सांगतात दोन दिवस झाले मुले उपाशी आहेत त्यामुळे मुले खेळायला आले नाही.कारण अन्न धान्याची मदत महिन्याला भेटत असायचे ते अजून मिळाले नाही.ते मिळाल्याला तीन दिवस लागतील.त्यामुळे मुलेही तीन दिवस उपाशी राहतील.वराळे काका अगदी कंठ दाटून ते सांगत होते.त्यामुळे रमाबाई घरात आपल्या खोलीत जातात थोड्या रडत बसतात.नंतर कापटातील डबा काढतात त्यातील सोन आणि सोन्याच्या हातात्तील बांगड्या काढून वरालेच्या हातात देतात.विका किंवा गहान ठेवून ह्या मुलाच्या जेवणाचा बंदोबस्थ करा.त्या नंतर मुले पोटभर जेवतात आणि खूप आनंदात राहतात.हे पाहून रमाबाई खूप आनंदी होतात.त्यामुळे सर्व मुले रमाबाईला रमाआई रमाई म्हणून बोलायला लागतात.वराळे काकाच्या त्या वेळे असून सर्वच लोक रमाबाई च्या रमाई झाल्या.

रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्री हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्री हि जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता हि असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट प्रयन्त रमाबाईनी हाल अपेष्ट,दुख गरिबी याच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या पण त्यांनी बाबासाहेबाकडे तक्रार केली नाही अशा माता रमाई, रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या त्याग,कष्ट आणि जिद्धीला कोटी कोटी प्रणाम.आणि सर्व मातां भगिनींना हार्दिक शुभेच्छा !.धन्यवाद !!!.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९