महावितरणची मनमानी थांबवावी! वीज बिलाच्या नावाखाली सतत वीज पुरवठा खंडित

34

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)9075913114

बीड(दि.26मार्च):-जिल्ह्यासह सध्या थकीत वीज बिलाच्या नावाखाली वीज वितरण कडून वीज पुरवठा सतत खंडित केला जात असून, यामुळे सण उत्सवाच्या दिवसांत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन महावितरण, नगरपरिषद प्रशासकांची तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा व महावितरणची मनमानी थांबवावी.

अशी मागणी माजी नगरसेवक रंजित बनसोडे यांनी केली आहे. नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून आतापर्यंत चार वेळा कनेक्शन कट केले आहेत. तसेच जाणूनबुजून वीज खंडीत जाते यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. व याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.