संपूर्ण पिक नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये हेक्टरी मदत करा

30

✒️सचिन महाजन(वर्धा प्रतिनिधी)मो:-9765486350

वर्धा(दि.27ऑगस्ट):-आमदार समीर कुणावार यांची जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना मागणी. गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक संपूर्ण नष्ट झाले.

असून त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे पेरणीच्या सुरूवातीला सुध्दा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत पेरलेले बियाणे उगवले नव्हते तसेच अनेक शेतकऱ्यांना दुब्बार पेरणी सुध्दा करावी लागली होती आणि आता त्यांच्या हातात आलेले पिक संपूर्ण नष्ट झाले असून यासर्व शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.