प्रतिकारशक्ती वाढविणे : माझेच कर्तव्य !

29

[जागतिक क्षयरोग दिन]

क्षयरोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. तो आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी – ट्युुबरक्युलॉसिस म्हणून ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५ टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांनाही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण सर्वानाच हा आजार जडत नाही. कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. मात्र शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.

म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ज्या व्यक्तीला क्षयरोग-टिबी असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात व हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्या निरोगी व्यक्तीला या जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना या रोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी दुश्चिन्हे दिसून आली तर त्याच्या दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक असते. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा.हाडे सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग आदी. हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा औषधांना चिकटून रहाणे ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे. ते अवयव – मेंदूची आवरणे, मणके व इतर हाडे, लैंगिक अवयव यावर परिणाम करतात.
रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा जीवाणू मुंबई येथील ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय व सर जेजे. रुग्णालयात काम करत असताना शोधला.

सर जेजे.रुग्णालयात रोग विकृतिशास्त्र – पॅथालॉजी विभागात कॉकची खोली जतन करण्यात आली आहे. रॉबर्ट कॉकच्या योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. या आजाराचे प्रकार : १) फुफ्फुसाचा क्षयरोग – दूषित व अदूषित थुंकी, २) फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा – ग्रंथीचा क्षयरोग, हाडाचा व सांध्याचा क्षयरोग, जनन व विसर्जन संस्थांचा क्षयरोग, ३) मज्जासंस्थेचा क्षयरोग, ४) आतड्यांचा क्षयरोग. आजार टाळण्यासाठी बीसीजी.नावाची लस वापरली जाते. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते. पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरही हा आजार बळावण्याची शक्यता आहे. आजार टाळण्यासाठी दक्षता घ्यावी. चांगल्या पद्धती म्हणजे पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, क्षयरोग तपासण्या करून घेणे, क्षयरोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे, तोंड झाकणे, आदी. रुग्णांची लक्षणे – दोन आठवड्यांहून अधिक काळ बेडकायुक्त खोकला – १५ दिवसांपेक्षा जास्त काळ असणारा, हलकासा परंतु रात्री येणारा ताप, घटणारे वजन, भूक कमी होणे, बेडक्यातून रक्त पडणे, थकवा येणे, छातीत दुखणे, रात्री येणारा घाम, मानेला गाठी येणे आदी.

जीवाणूंचा प्रसार – उपचार न घेतलेला क्षयरोगाचा एक रुग्ण वर्षभरात १० ते १५ व्यक्तींना संसर्ग करू शकतो. दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, एड्सचे वाढते प्रमाण, कुपोषण, अस्वच्छता, अपुरे वा चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी याचा प्रसार होतो. दूषित धुलिकण, बाधित व्यक्तीची थुंकी, बाधित व्यक्तीचे इतर स्राव यापासूनही क्षयरोग होण्याची जास्त शक्यता असते. वयोवृद्ध असलेले, लहान बाळे, दुसऱ्या कोणत्यातरी कारणांनी ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, असे कमी पोषकता, दारूच्या आहारी गेलेले, जास्त गर्दीच्या ठिकाणी राहणारे गरीब लोक, अस्वच्छतेत राहणारे लोक आदी.

आजारपणात घ्यावयाची काळजी : खोकताना तोंडावर हातरूमाल धरणे. खुप कफ पडत असल्यास एका कपात जंतुनाशक घालून त्यातच थुंकावे; इतरत्र कुठेही न थुंकणे महत्त्वाचे. रुग्णाच्या राहण्याची व कामाची जागा हवेशीर ठेवावी. लहान मुलांचा व रुग्णाचा संपर्क टाळणे. घरात इतरांनीही टीबीची काही लक्षणे वाटल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असते. पण कुठल्याही दुष्परिणामाची थोडी जरी शक्यता वाटली तरी स्वतःच उपचार बंद करू नयेत. त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य असते. मात्र हा रोग बरा होतो. आजार टाळण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक असते. समतोल आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे अशी काही पथ्ये पाळल्यास प्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छता बाळगणे जरूरीचे असते. यासाठी डॉक्टरांनीच सांगितले पाहिजे अशातला भाग नाही. आपल्या आरोग्याची स्वतःच निगा राखावयास नको का? अंघोळ, नखे, केस, कान, नाक, दात आदींची स्वच्छता करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, हे विसरून कसे चालेल?

✒️ संकलन – शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी. (मराठी व हिंदी साहित्यिक)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली, जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).