दिव्यांग बांधवाच्या थालीनाद आंदोलनाने कुंभकर्ण शासन- प्रशासन जागे होईल काय?- शांताबाई चिंतले यांचा सवाल

    40

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो.नं.9970631332

    नांदेड(दि.1जुलै):-जिल्ह्यातील दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी दि २८जुन ते ९ जुलै २१ पर्यंत दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर* यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर कुंभकर्ण शासन- प्रशासनास जागे करण्यासाठी आज चौथ्या दिवशी जिल्ह्यातील १०० गावात थालीनांद आंदोलन करण्यात आले. यात 1 जुलै २०२१ रोजी बिलोली तालुक्यातील आळदी ग्रामपंचायत कार्यालय समोर अनेक दिव्यांगानी थालीनांद आंदोलनात घोषणेने थालीनांद करून परिसर दणाणून टाकले. दरम्यान सरपंचानी निवेदन स्विकारून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देले.

    निवेदनात दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगाना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करण्यात यावी, पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी, ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा, दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा, दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा, दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाईमुळे करावी आदी मागण्यांचा समावेश होता.

    थालीनाद आंदोलनात दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महिला ता अध्यक्ष शांताबाई चिंतले, रेज्याबाई करडे, ओमकार राजुरा,नागेश जुकरे, साविञाबाई ईबितदार करोणा चिंतले, मुस्कान शेख, मारोती चिदमलवाड, अर्चनाबाबु राचुरे व ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.