स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची – मुख्याधिकारी अर्पित चौहान

42

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र तसेच करियर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावर चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते तसेच चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित चव्हाण, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.
ए.वाघ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राचे समन्वयक डॉ.आर.आर.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी ‘स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी’ या विषयावर मार्गदर्शन करताना चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित चौहान म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्या अगोदर सदर परीक्षेचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघावा. मागील परीक्षांच्या प्रश्न पत्रिका बघून उत्तर पत्रिका लेखनाचा सराव करावा. त्याचबरोबर बहुविध विषयांचे पुस्तके, नियतकालिक तसेच वृत्तपत्रे यांचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची आंतरिक प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असून कौटुंबिक पाठबळ देखील अत्यंत मोलाचे ठरते. वेळेचे व अभ्यासाचे सुसूत्र नियोजन, अभ्यासातील सातत्य, जिद्द व चिकाटी, कठोर परिश्रम यांच्या बळावर निश्चितच यश प्राप्त करता येते’.यावेळी त्यांनी विद्यार्थीदशेपासून ते यूपीएससी परीक्षेत मिळविलेल्या यशापर्यंतचा प्रवास कथन केला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून वाचन, मनन व चिंतन केले पाहिजे. ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने वाचन व जिद्द मनात बाळगून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चितच प्राप्त होईल’.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ.एम.टी.शिंदे, डॉ.ए.बी. सूर्यवंशी, व्ही. पी.हौसे, डी.एस. पाटील, डॉ.एम एल भुसारे, एस. बी. देवरे, ए. आर. देशमुख, गोपाल बडगुजर, संदीप गोपाल पाटील आदि प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही. डी.शिंदे यांनी केले तर आभार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सदस्य एस.बी.देवरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करियर कट्टाचे समन्वयक वाय. एन. पाटील तसेच मानसमित्र समुपदेशन केंद्राचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.