सिल्लोड प्रहार संघटनेचे आक्रमक उपोषणामुळे दिव्यांगाना मिळाला न्याय

28

🔹प्रशासकीय यंत्रेने तेवीस पैकी वीस मागण्या केल्या मान्य

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

सिल्लोड(दि.8सप्टेंबर):-सोमवारी सकाळी १० वाजून तीस मिनिटे पासून,सिल्लोड तहसिल तहसील कार्यालय समोर आयोजित करण्यात आलेल्या आमरण उपोषणास संदर्भात;तहसील कार्यालयाशी संबंधित,तहसील पंचायत कार्यालय संबंधित,सिल्लोड नगरपालिकेशी संबंधित अपंगांचा 2013 पासून असलेला अनुशेष तसेच अपंगांच्या एकूण 23 मागण्यांपैकी वीस मागण्यांची पूर्तता माननीय नायब तहसीलदार संजय कुलकर्णी साहेब यांनी लिखित स्वरूपात मागण्या मान्य केल्यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली.

प्रसाद तहसील कार्यालय सिल्लोड तसेच पंचायत समिती कार्यालय सिल्लोड सिल्लोड नगरपालिका यांच्यामार्फत जर वरील 23 मागण्यांची पूर्तता झाली नाही तर येत्या पंधरा दिवसात प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे सिल्लोड तालुका अध्यक्ष श्री हरी प्रताप गिरी तसेच प्रहार(दिव्यांग)बचत गट शाखा सिल्लोड यांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या वतीने सादर प्रशासनास इशारा देण्यात आला.

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री ओम प्रकाश उर्फ आमदार बच्चू कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेले सिल्लोड तालुका अध्यक्ष श्री.हरी प्रताप गिरी यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाची सांगता झाली.प्रहार संघटनेच्या जोशात प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.यावेळी औरंगाबाद येथून विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच जालना येथून प्रहार संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भास्कर चव्हाण,कोषाध्यक्ष शंकर शिरगुळे,आकास बरकेसे,तालुक्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकारी श्रावण नाना मोरे, अलीम पठाण,साजिद पठाण,रियाज शेख,मुक्तार उस्मान सय्यद,फिरोज शेख, निजाम अली सय्यद, संजय भगवान पंडित पोपट कडुबा मोरे,मोबिन गप्फार मुल्ला,राजू अजीम शेख,सलीम कलिम पठाण,विलास ब्रदर,अनिल रामदास गोंधळे,ईरफन नबी मेवाती,सिंकधर नबी,अक्तार नबी,अमीन पठाण,नागरे भास्कार,संतोष शामराव घोडके,शेख आरेफ ईस्माईल,कामिका विलास मोरे, करुणाबाई दगडू मोरे,बाजीराव कोंडु मोरे,भागीनाथ गुंजाळ,फौजिया अनिस पठाण,फहदा ईद्रस बातोके, सुदाम बाजीराव मोरे,अमोल हरी गिरी,रामदास सखाराम सागरे, कृष्णा निळुबा जरारे,लुकमान शेख रज्जाक रमेश गुलाब पुरी,सुरेश चव्हाण,शुभम सांन्डू चव्हाण,भगवान पंढरीनाथ गव्हाणे,श्रीधर रघुनाथ मोरे,नंदू सहारे,असेफ बाबू पटेल,अनिल रामदुलारे जयस्वाल,समद शेख बशीर,आईशा मुसरोदिन सैय्यद,पांडुरंग भिका मोरे,अकील शेख शमीम,महेमुद शेख,अंकुश बाळा काकडे,अर्जुन विठ्ठल साळवे,आजिनाथ सखाराम जाधव,अशोक भिकन सपकाळ,विठ्ठल संपत गायकवाड,नंदू दौलत भोटकर, ज्ञानेश्वर हरिदास चाथे, पायल गोपाल कवाल,सुमित्राबाई भीमराव लोखंडे, अदमान चाऊस, उदयसिंग विठ्ठल सिंग गोठवल,सोदक अमीर पठाण,फैजान जुबेर देशमुख, दत्ता भागाजी भोसले,सुभाष श्रीरंग पाडळे,ज्ञानेश्वर शंकर सुरडकर, कांताराम आनंदा सपकाळळा,सविता अंबादास जाधव,संजना नवनाथ साखळे,हिम्मतराव मैपत काकडे,शेख वाजिद,भीमराव नथू दांडगे,यासह असंख्य प्रहार कार्यकर्ते तसेच तालुक्यातील संपूर्ण वंचित जनता मोठ्या प्रमाणात उपोषणस्थळी हजर होतो.हे उपोषणाठीप्रहार अपंग बचत गट घाटनांद्रा तसेच संपूर्ण प्रहार घाटनांद्रा येथील प्रमुख पदाधिकारी यांच्या सिंहाचा वाटा होता.