आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ?

103

▪️रामदास आठवले यांच्या २५ डिसेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख

राजकिय सत्तेची उभं लागली की मोठं मोठी माणसं बदलतात,सरकारी सत्तेची चटक लागली की माणसं सर्व विचारधारा त्याग कष्ट प्रामाणिकपणा गरिबी जात धर्म सर्वच सोडून फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करतात. ज्यावेळी त्यांना वडापाव विकत घेऊन खाण्यासाठी पैसे नसतात तेव्हा ते सर्वात मोठ्या मनाचे श्रीमंत असतात. आणि सत्तेवर गेल्यावर त्यांच्या कडे पैसे कुठून कसे येतात यांचा त्यांनाच पत्ता लागत नाही. तेव्हा ते पूर्णपणे बदलून जातात. राजकारणात असे एकदोन नाही तर हजारो उदाहरणे देता येतील की ते सत्तेत गेल्यावरच बदलले.त्यांचे एक जितें जागते उदाहरण म्हणजे रामदासजी आठवले, आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ?. हे ते विसरले की काय असे वाटते.म्हणूनच हे….

असंघटित कष्टकरी गोरगरीब कामगार मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणारा पँथर रामदास आठवले एकेकाळी दलित पँथरचा मुख्य झेप घेणारा चित्ता म्हणजेच पँथर होता. आणि आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होता. हा इतिहास कोणीच नाकारू शकत नाही. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ?. हे अनेक चळवळीचे किर्याशील काम करणारे कार्यकर्ते म्हणतात.

आजचे रामदास आठवले कालचे पँथर होते यावर विश्वास बसत नाही.रामदासजी आठवले यांनी दलित पँथरच्या माध्यमातून महाराष्ट्रात भिमसैनिकांची एक मजबूत फळी निर्माण करून प्रस्थापित जातीयवाद्यांच्या उरात धडकी भरवली होती. त्यामुळेच त्याकाळी दलित समाज सुरक्षित राहिला होता. दलित पँथरच्या माध्यमातून या भिम सैनिकांच्या नसानसांत आंबेडकरी चळवळ भिनली होती. स्वार्थासाठी काहींनी चळवळीशी विचारधारेशी गद्दारी केली. त्यामुळे लेटर हेड वर जगणारे कार्यकर्ते जास्त दिवस समाजाला व शासन प्रशासनातील अधिकारी वर्गांना मूर्ख बनवू शकत नाही. म्हणूनच ते बरबाद, उध्वस्त झाले. तर काही संधीचा लाभ घेऊन नांवा रुपाला येऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत झाले. आजचा बुध्दीजीवी आंबेडकरी समाज रामदासजी आठवले या भिमयोध्द्याचा आंबेडकरी चळवळीतील व्यापक संघर्ष विसरून त्यांच्याशी कृतघ्न होताना दिसत आहे.

मुंबईतील वडाळयाच्या सिद्धार्थ होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेऊन नेत्याचे हँडबील,पोस्टर लावणारा रामदास सर्वांचा जवळचा मित्र आणि कार्यकर्ता होता.आणि तो आज ही आहे.तेव्हा ही तो स्वताला नेता म्हणवून घेत नव्हता आज भी घेत नाही.तेव्हा भी कुठे भी बोलताना घाबरत नव्हता आणि आज भी तो बोलताना घाबरत नाही.कोणाच्याही स्टेजवरून तेव्हा भी बिनधास्त बेधडक बोलत होता.आपण कुठे आहोत आणि कोणा समोर बोलतो त्याचे तेव्हा भी भान ठेवत नव्हता आणि आज भी ते राज्यसभेत बोलताना भान ठेवत नाही.त्यामुळे त्याच्या लोकप्रियते वर कोणताही फरक पडला नाही.कारण रामदास तेव्हा ही दास नव्हता आज भी ही नाही तेव्हा भिम सैनिक कार्यकर्ता होता आणि आज भी भिम सैनिक कार्यकर्ता आहे.आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ?. हे विसरता येणार नाही.

रामदास आठवले यांचे तेव्हा फक्त हजारो भक्त होते ते आज लाखोच्या संख्येने राज्यात नव्हे तर देशभरात आणि परदेशात झालेत,आणि आहेत.म्हणुन जागतिक बौद्ध परिषदला त्यांनाच बोलविल्या जाते, इतर बुद्धिजीवी विचारवंत नेत्यांना नाही.त्यामुळे ते कुठे भी कधी ही काही बोलले तरी त्यांच्या भक्तावर कोणताच फरक पडत नाही. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ते सर्व सबुरीने वागतात.त्यांनी खासदारकी साठी मंत्रीपदा करिता कुठे ही युती आघाडी केली.तरी हा भक्त त्यांच्या सोबत आहेच.शहरातील सुशिक्षित,सुरक्षित नोकरी,धंदा करणारा जसा सोबत आहे त्याही पेक्षा जास्त खेड्या पाड्यातील,शहरातील झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता आणि समाज आठवले सोबत आहे.मग तो सरपंच,नगरसेवक,आमदार बनला नसला तरी तो मेंढरा सारख आठवले मागे जातो.आणि जाणार आहे. रामदास आठवले यांचे राज्यसभेतील कविता वाचन,विनोद,शेरशाहिरी राज्यात नव्हे तर देशभर चॅनेल,प्रिंट मिडिया,सोशल मिडिया, फेसबुक या मध्यमा द्वारे मोठया प्रमाणात फिरते असते. म्हणून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तु?. हे सांगावे लागते.आणि हे सांगण्याचे लिहण्याचे धाडस मी १९९७ पासुन दरवर्षी करतो. रामदास नाही, तर भिम सैनिक कार्यकर्ताच आहे. आज ही त्यांच्याकडे कोणी मदत मागायला गेला तर खाली हात जात नाही.

भारतीय मागासवर्गीय चळवळीत ज्यांनी स्वताची जागा निर्माण केली असे दलित पँथरचे तरुण तडपदार बिनधास्त बेधडक क्रांतिकारी नेते रामदास बंडू आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यात झाला.१९७१ ला सिद्धार्थ होस्टेलमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले आणि १९७२ ला दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा त्यात सतत सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून रामदास सर्वाना परिचित होता. त्यात त्यांची जडणघडण झाली. हॅंडबिल वाटणारा आणि पोस्टर लावणारा कार्यकर्ता.कालकथीत प्रसिद्ध कवि नामदेव ढसाळ,कालकथीत थोर विचारवंत राजा ढाले, आजचे थोर साहित्यिक ज.वी पवार,कालकथीत प्रा.अरुण कांबळे,या नेत्याच्या पुढे रामदास आठवले कधी निगुन गेले त्यांना ही कळले नाही.

ते जर रामाचे दास असते तर त्यांनी एवढी गरुडझेप घेतली असती काय ?. तेव्हाच्या पँथर नेत्याचे आज कुठे अस्तित्व ही दिसत नाही.त्यांचे ना भक्त आहेत ना शिष्य!. समाजात कुठे ही अनुयाय का नाहीत ?. हा व्यक्ती आणि चळवळ यातील फरका आहे. राजकारण,समाजकारण, आर्थिकारण हे नेहमी संधीवर अवलंबून असते आणि चालते.योग्य वेळी संधी आली तर निर्णय घेण्याची क्षमता कार्यकर्त्यात असते.लोक काय म्हणतील याचा विचार न करता कार्यकर्तानी एकत्र पणे भाजप सेने बरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय घेतला होता. ते धाडस रामदास आठवले यांनी एकटयानी केले असते तर राज्यातील दुसरया,तिसऱ्या फळीतील नेते,जिल्हा नेते रामदास आठवले सोबत राहिले नसते.रिपाई मध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन आठवले एकाकी पडले असते, त्यांची डांगळे सारखे गत होयाला पाहिजे होती. ती झाली नाही कारण रामदास कार्यकर्त्यांचा नेता असलेला कार्यकर्ता आहे.म्हणुन तो दास नाही भिमसैनिक कार्यकर्ता आहे. आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होता तो. हे विसरता येणार नाही.

मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात पहिला धावून जाणारा नेता म्हणजे रामदास आठवले.आज ही ते अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात प्रथम पोचतात आणि सर्व वृत्तपत्रात फोटोसह बातमी छापून येते. ती धमक इतर कोणत्याही नेत्यात नाही.त्यांची फारशी दाखल प्रशासन व प्रिंट मिडिया घेत नाही.मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक चळवळीत रामदास आठवले बद्दल नाराजी असली तरी त्यांच्या सारखा समाजात कार्यकर्त्यात मिसळणारा दुसरा नेता नाही.त्यामुळेच समाजात त्याचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळेच इतर सर्व मागासवर्गीय आंबेडकरी चळवळीतील गटा तटात आठवले दबंग गट म्हणून ओळखल्या जातो. नेते भरपूर आहेत पण तो जिव्हाळा इतर नेत्या मध्ये नाही.वसतिगृहात राहून राजकारणात जागा बनविणारे रामदास आठवले कुशल संघटक आहेत ते सर्व गटाना एकत्र करून पंधरा वीस आमदार आणि पाच सात खासदार सहज निवडून आणु शकले असते.अनेकांनी त्यांना धोका दिल्यामुळे त्याची इच्छा शक्ती आता संपली आहे. कारण ते एकमात्र मान्यताप्राप्त नेते म्हणून देशभर ओळखल्या जातात. त्यांची सर्व मध्यम म्हणजे नाटककार, चित्रकार,विडंबनकार, पत्रकार,संपादक विविध वाहिन्या वरील सिरीयल वाले दाखल घेतात,चला हवा येऊ द्या ने तर त्यांना सर्व समाजाच्या घराघरात पोचविले.विविध वाहिनीवर पक्ष नेत्यांच्या चर्चात भी रामदास आठवले यांना विशेष प्राधान्य दिले जाते.कारण त्यांची समाजावर पकड होती म्हणूनच ना!. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ? हे विसरता येत नाही.

रामदास आठवले भाजपा मुळे राज्यसभेवर गेले.म्हणूनच त्यांची वैचारिक उद्धिष्ट बदलली त्यामुळेच विचार करण्याची काम करण्याची पध्दत बदलली असे समजल्या जाते. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसा निमित्य मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.ते राज्यभरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ताना ते मना पासून आवडले होते.कोणीच आठवले साहेबाच्या विरोधात असे का लिहले म्हणून मला आई बहिणीवरून शिवीगाळ केली नाही,आणि आठवलेच्या एका ही भक्ताने माझे हात पाय तोडण्याची धमकी दिली नाही. कारण ते आठवले नेत्याचे पाळीव कुत्रे नाही तर एका सच्चा आंबेडकरी विचारांच्या नेत्यांचे भिमसैनिकांचे सैनिक आहेत. म्हणून मी छाती ठोक पणे लिहतो कि रामदास आठवले रामाचे दास नाही तर खरे भिम सैनिक आहेत. सच्चे आंबेडकर विचारचे सैनिक आहेत,रामदास आठवले एक व्यक्ती राहिला नाही तर एक चळवळ झाली आहे.

त्यांच्या बाबत राजकीय,वैचारिक दृष्ट्या अनेक मतभेद असू शकतात.त्या वेदना त्यांनी अनेकदा एकल्या आणि त्यातून मार्ग काढला, कॉंग्रेस राष्टवादीचे प्रत्येक जिल्ह्यातील नेते रिपाईच्या कार्यकर्त्यांना सालदार,विकाऊ टाकावू समजून वागनुक देत होते.पण भाजप सेना युती बरोबर आठवले गेल्या मुळे खेड्यापाड्यातील वातावरण बदलले आहे. कारण कापटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा अशी म्हण शहाणे लोक सांगतात, तशी परिस्थिती गावागावत होती. खैरलांजी घडल्या नंतर राष्टवादीचा पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभेत धुवा उडला पाहिजे होता.पण तसे झाले नाही याची कारणे कार्यकर्त्यांनी शोधली पाहिजे. चला हवा येऊ दया च्या कार्यक्रमात अरविंद जगताप यांनी लिहलेल्या पत्रात कार्यकर्त्याच्या वेदना अतिशय मार्मिक शब्दात मांडल्या होत्या.त्याचे उतर आठवले साहेबांनी तेवढेच मार्मिक पणे दिले होते. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तू ? हे विसरता येत नाही.

संपादक यांनी रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” हा विषय दिला यावर फक्त त्यांच्यातील व्यक्ती, नेता, आणि कार्यकर्ता हे तपासून पाहिल्यावर मला रामदास आठवले राम दास कधीच वाटला नाही तर सैदव्य कार्यकर्ताना आत्मविश्वासाने कोरे लेटरहेड देणारा नेता,कार्यकर्ता, भिमसैनिक वाटला. म्हणूनच मी पाक्षिक बंडखोरच्या माध्यमातून “आंबेडकरी चळवळीतील दीपस्तंभ” या विशेषांकासाठी हा विशेष लेख लिहला आहे.व्यक्ती, कार्यकर्ता,नेता कोणताही असो त्यांच्यातील चांगल्या कला,कौशल्य, संघटनात्मक नेतृत्व, आणि काम करण्याच्या दृष्टीने चांगल्या गुणांची नोंद घेतली पाहिजे. आणि वाईट गुणां कडे दुर्लक्ष केले पाहिजे.

संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाला ना. रामदासजी आठवले यांचा आंबेडकरी चळवळीतील व्यापक संघर्ष माहीत आहे. काळानुरूप राजकीय सत्तास्पर्धेत बदल झाला असेल.हे लक्षात घेऊन फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या युवा भिमसैनिकांना हा इतिहास माहिती असावा म्हणूनच रामदास आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना आंबेडकरी चळवळीतील “दीपस्तंभ” होतास तु ?. आम्ही विसरत नाही तु ही विसरू नको.हे जाहीरपणे सांगणे आहे.

आपला एक भिमसैनिक

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई- (९९२०४०३८५९)