✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चिमूर(दि.23डिसेंबर):-समाजमन बद्दलविण्यासाठी प्रत्यक्ष समाजाशी नाळ जुळणे गरजेचे असते समाजाचे नीट निरीक्षण व परीक्षण असणे गरजेचे असते व हेच संत गाडगेबाबा नि निस्वार्थी वृत्तीने जगावेगळे कार्य केले त्यांचे प्रबोधन प्रश्न च प्रश्न जनसामान्य यांना बोलते करणे एक न शिकलेला माणसांनी मुलांच्या शिक्षण विषयी आग्रही असणे शिक्षनाचे महत्त्व पटवून सांगणे गाडगेबाबा यांनी बाह्य स्वच्छता तर केली पण बुरसटलेले मने ही स्वछ करण्याचे काम गाडगेबाबा नि अविरत केले.
व सतत कीर्तना च्या माध्यमातून सतत प्रबोधन केले त्याना खरी आदरांजली व समरण करयेचे असेल तर प्रत्येका नि त्यांच्या सारखे प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प प्रत्येकांनी करावा अश्या बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवापूर बंदर येथे ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी व महिला बालकल्याण चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अद्यक्ष कल्पना चनदेलकर शारदा महिला मंडळ आद्यक्ष ह्या होत्या यावेळी परिसरात स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका शशिकला ननावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे रूपाली ननावरे यांनी केले तर यावेळी परिसरातील पुष्कळ महिला उपस्थित होत्या