युवकमित्र परिवार आयोजित ‘राज्यस्तरीय युवा संमेलन,पत्रकार भवन,नवी पेठ पुणे येथे यशस्वी संपन्न

25

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.10जानेवारी):-विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते,लेखक युसूफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित ‘युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले.
राजमाता आई जिजाऊ जयंती,स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार,नंदूरबार या चळवळीमार्फत पुणे शहरात ‘राज्यस्तरीय युवा संमेलन’यशस्वी पार पडले.

यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक व युवतीचा यावेळी ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार’देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर हे होते तर उदघाटक म्हणून महाएनजिओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत,ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल,सामाजिक कार्यकर्त्या उज्वलाताई गायकवाड, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान,युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन,उदयकाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल यांच्यासह राज्यातील युवक युवती उपस्थित होते.अमर हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.