विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

215

🔹शेतकऱ्यांना हक्काचे जमिन पट्टे द्या – सुदामभाऊ राठोड 

✒️जिवती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

जिवती(दि.13जानेवारी):- जिवती तालुक्यातील शेतकरी 1950 ते 1955 पासुन शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमिन पट्टे मिळालेले नाही. म्हणून या शेतकन्यांना शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही कारण प्रत्येक योजनेच्या लाभ घेण्यासाठी जमिन पट्टे असणे अनिवार्य आहे जसे एखाद्या शेतकऱ्यांना व्यवसाय करायचे झाल्यास लोन घेण्यासाठी बँक मध्ये कर्जाचे अर्ज केला.

तर तो अर्ज नामंजूर करतात म्हणून ना. एकनाथ शिंदे यांचे सरकार व शेतकऱ्यांचे हित जोपासणारी सरकार आहे म्हणून मंत्री महोदय आपण आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय समोर शेतकऱ्यांचे दुःख मांडून जिवती तालूक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळावून दयाल अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडी यांच्या वतीने करण्यात आली.

जर मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडी तिव्र आंदोलन करेल या आंदोलनामध्ये काही हिंसक घटना घडल्यास महाराष्ट्र शासन जबाबादार राहील याची नोंद घ्यावी असे विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडी यांच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले.